शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पाहणीविनाच जनावर विक्रीचा दाखला!

By admin | Updated: April 18, 2017 01:24 IST

गुरांच्या बाजारातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर : चोरीच्या जनावरांची विक्री होण्याची शक्यता

स्टिंग आॅपरेशनशीतल धांडे - रिसोडजनावरांची कोणत्याही प्रकारे पाहणी न करताच खरेदी-विक्रीची अधिकृत पावती दिली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनने समोर आणला.चोरीच्या जनावर विक्रीला पायबंद बसावा, जनावर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी सहकार व पणन विभागाने काही बंधने घालून दिलेली आहेत. ही बंधने गुरांच्या बाजारात पाळली जात नाहीत, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. त्यानुसार रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम यासह अन्य बाजार समितीतील गुरांच्या बाजारात पाहणी केली असता काही ठिकाणी ओळखीचा पुरावा मागितला जातो, तर काही ठिकाणी कोणताही पुरावा न मागता व जनावरांची पाहणी न करताच अधिकृत पावती दिली जात असल्याचे आढळून आले. हा प्रकार जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीतील गुरांच्या बाजारात कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. बाजार समिती प्रशासनाच्या सूचना असतानाही, गुरांच्या बाजारात पावती बनविताना या नियमांकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे चोरीच्या जनावरांची विक्री होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.वाशिम जिल्ह्यात बाजार समिती व उपबाजारातून जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. चोरीच्या जनावरांच्या विक्रीला रोख लावणे आणि चोरीच्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविणे, या दुहेरी उद्देशाने सरपंच, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवकाने दिलेला जनावर मालकी हक्काचा दाखला पशुपालकाने सोबत आणणे बंधनकारक आहे. जनावर खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर बाजार समितीमधून जनावर घेणाऱ्याला अधिकृत दाखला घ्यावा लागतो. असा दाखला देताना संबंधितांनी सरपंच किंवा पोलीस पाटलाचा दाखला, ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड पाहणे आवश्यक आहे. वर्णन केलेल्या जनावरांची खात्री म्हणून पाहणी करणेही आवश्यक आहे. या नियमाला काही ठिकाणी पायदळी तुडविले जात आहे. जनावर खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांची कोणतीही खातरजमा केली जात नाही, ओळखीचा पुरावा न मागताच जनावराच्या खरेदी-विक्रीचा अधिकृत दाखला दिला जात असल्याचे दिसून आले. याकडे जिल्हा उपनिबंधकांसह बाजार समिती प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.बाजार समितीमधील गुरांच्या बाजारात जनावरांची खरेदी-विक्री करताना संंबंधिताचा ओळखीचा पुरावा घेणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा न घेता किंवा जनावरांची पाहणी न करता खरेदी-विक्रीची पावती देणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल. - ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक, वाशिम