शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ग्रामपंचायत बांधणी योजनेत अमरावती विभाग उपेक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:10 IST

अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.

ठळक मुद्दे३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायतीया तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेत एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी दुसऱ्या टप्यात ५४ ग्रामपंचायतीची व निवड झाली आहे. यात अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कायालयाची इमारत बांधण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ २३ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आली अहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता, त्यासाठी ऊपलब्ध असणाºया स्तोत्रांची मर्यादा विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ३०२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यामध्ये अमरावती विभागातील एक हजार लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या ४० ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यात बुलडाणा जिल्ह्यातील १६, यवतमाळ जिल्ह्यातील १२, अकोला जिल्ह्यातील ७, वाशिम जिल्ह्यातील ३ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. आता दुसºया टप्प्यात ३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अमरावती विभागाच्या ५ जिल्ह्यातून केवळ तीन ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यात अमरावती जिल्ह्यातील २ आणि अकोला जिल्ह्यातील केवळ एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विभागातील यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायती अस्तिवात असून, या ग्रामपंचायतींचा कारभार हा जिल्हा परिषद शाळा, सामाजिक सभागृहे किंवा भाड्याच्या जागेतून चालविण्यात येतो; परंतु या तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत