शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ग्रामपंचायत बांधणी योजनेत अमरावती विभाग उपेक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:10 IST

अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.

ठळक मुद्दे३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायतीया तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेत एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी दुसऱ्या टप्यात ५४ ग्रामपंचायतीची व निवड झाली आहे. यात अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कायालयाची इमारत बांधण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ २३ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आली अहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता, त्यासाठी ऊपलब्ध असणाºया स्तोत्रांची मर्यादा विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ३०२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यामध्ये अमरावती विभागातील एक हजार लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या ४० ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यात बुलडाणा जिल्ह्यातील १६, यवतमाळ जिल्ह्यातील १२, अकोला जिल्ह्यातील ७, वाशिम जिल्ह्यातील ३ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. आता दुसºया टप्प्यात ३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अमरावती विभागाच्या ५ जिल्ह्यातून केवळ तीन ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यात अमरावती जिल्ह्यातील २ आणि अकोला जिल्ह्यातील केवळ एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विभागातील यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायती अस्तिवात असून, या ग्रामपंचायतींचा कारभार हा जिल्हा परिषद शाळा, सामाजिक सभागृहे किंवा भाड्याच्या जागेतून चालविण्यात येतो; परंतु या तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत