शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ग्रामपंचायत बांधणी योजनेत अमरावती विभाग उपेक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 16:10 IST

अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.

ठळक मुद्दे३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायतीया तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ‘बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेत एक हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी दुसऱ्या टप्यात ५४ ग्रामपंचायतीची व निवड झाली आहे. यात अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही.राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कायालयाची इमारत बांधण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना’ २३ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आली अहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता, त्यासाठी ऊपलब्ध असणाºया स्तोत्रांची मर्यादा विचारात घेऊन बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ३०२ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली होती. त्यामध्ये अमरावती विभागातील एक हजार लोकसंख्या असलेल्या आणि स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या ४० ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यात बुलडाणा जिल्ह्यातील १६, यवतमाळ जिल्ह्यातील १२, अकोला जिल्ह्यातील ७, वाशिम जिल्ह्यातील ३ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. आता दुसºया टप्प्यात ३ आॅगस्ट २०१८ च्या निर्णयाद्वारे ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अमरावती विभागाच्या ५ जिल्ह्यातून केवळ तीन ग्रामपंचायतींचा समावेश असून, त्यात अमरावती जिल्ह्यातील २ आणि अकोला जिल्ह्यातील केवळ एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विभागातील यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यातही स्वत:ची स्वतंत्र इमारत नसलेल्या हजारो ग्रामपंचायती अस्तिवात असून, या ग्रामपंचायतींचा कारभार हा जिल्हा परिषद शाळा, सामाजिक सभागृहे किंवा भाड्याच्या जागेतून चालविण्यात येतो; परंतु या तिन्ही जिल्ह्यातील स्वत: इमारत नसलेल्या एकाही ग्रामपंचायतीचा समावेश बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत करण्यात आलेला नाही.

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत