शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पीक कर्जाची रक्कम बँकेत पडून !

By admin | Updated: May 23, 2017 17:55 IST

समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास हंगामही धोक्यात

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असला तरी रोकड तुटवड्यामुळे मंजूर पीक कर्जाची रक्कम बँकेतून "विड्रॉल" करणे अशक्य ठरत आहे. परिणामी, ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून या समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास हंगामही धोक्यात सापडणार असल्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे. यंदा जिल्ह्यातील १.५ लाख शेतकऱ्यांसाठी ११५० कोटी रुपये कर्ज वितरणाची तरतूद करण्यात आली. काही शेतकऱ्यांना कर्ज मंजूर देखील झाले. कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, तो पैसा ह्यएटीएमह्णमधून काढावा लागत असून बँकांकडे एटीएममध्ये टाकण्यास पुरेशी रक्कमच नसल्याने शेतकरी आणि बँकांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेला या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सद्या खरीप हंगामासाठी बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध बँकांचे एकूण १ लाख ९८ हजार ५४० शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख ६२ खातेदार पिककर्जासाठी पात्र आहेत. यावर्षी सर्व  बँका मिळून ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वितरित करणार आहेत. पिककर्जाची रक्कम रोखीने न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जपुरवठा करणारी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या ह्यरूपे केसीसीह्ण कार्डवर पैसे जमा करीत आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या एटीएममधून काढावी लागते आणि एटीएममध्ये टाकण्यासाठी बँकेकडे पुरेसे पैसेही नाहीत. बँकेच्या वाशिम येथील मुख्य शाखेला त्यांच्या दिवसभराच्या व्यवहारासाठी १० लाख रुपये मिळतात. यातील काही रक्कम त्यांना एटीएममध्ये टाकावी लागते. त्यातच त्यांच्या एटीएममध्ये केवळ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाच टाकणे शक्य असून, त्यांना स्टेट बँकेकडून मिळणाऱ्या १० लाखाच्या रकमेत सर्वच नोटांचे कमी अधिक प्रमाण असते. हीच स्थिती इतरही बँकांची असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर जाणवत असल्याचे दिसत आहे.