शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अगोदरच विलंब; त्यातही विहिर बांधकामांचे कार्यारंभ आदेश मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ) : सन २०१८-१९ या वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रशासकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : सन २०१८-१९ या वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रशासकीय दिरंगाई आणि पदाधिकाºयांच्या डावपेचात अडकली आहे. एका महिन्यापूर्वी ईश्वरचिठ्ठीतून निवड झालेल्या लाभार्थींना अद्याप विहिर बांधकामासंदर्भात कार्यारंभ आदेश मिळाले नसल्याने ३१ मार्च २०१९ पूर्वी बांधकाम पूर्ण कसे करावे, असा प्रश्न लाभार्थींना गटविकास अधिकाºयांकडे उपस्थित केला आहे.अनु. जाती तसेच अनु. जमातीलमधील शेतकºयांचे जीवनदान उंचाविण्यासाठी  डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. सन २०१८-१९ या वर्षात या योजनेंतर्गत लाभार्थींची निवड प्रक्रिया प्रचंड दिरंगाईने राबविण्यात आली. डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या सभागृहात ईश्वर चिठ्ठीतून लाभार्थींची निवड झाल्यानंतर तातडीने कार्यारंभ आदेश मिळणे पात्र लाभार्थींना अपेक्षीत होते. मात्र, अद्याप कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी विहिर बांधकाम पूर्ण कसे करावे, या विचाराने शेतकºयांची झोप उडाली आहे. ईश्वर चिठ्ठीतून निवड झाल्यानंतरही लाभार्थी निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने यामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप लाभार्थींनी केला. मागासवर्गीय शेतकºयांच्या योजनेत व्यत्यय निर्माण करून ही योजना रखडविली जात असल्याचा आरोपही होत आहे. या पृष्ठभूमीवर निवड झालेल्या लाभार्थींना विहिर बांधकाम सुरू करण्यासंदर्भात तातडीने आदेश देण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारिप-बहुजन महासंघ शाखा रिसोड तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांनी २८ जानेवारी रोजी गटविकास अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे दिला. मागासवर्गीय शेतकºयांवर अन्याय होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांसह भारिप-बमसंच्या पदाधिकाºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड