शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

वाशिम जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:46 IST

५ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार पूर्ववत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हमीदराने शेतमाल खरेदी न केल्यास व्यापाºयांवर कारवाईची कुठलीही तरतूद नसल्याने, व्यापाºयांनी शेतमालाची खरेदी पुर्ववत सुरू करण्यासंदर्भातील पणन संचालनालयाचे पत्र जिल्हा उपनिबंधकांमार्फत व्यापाºयांना प्राप्त झाले. त्याअनुषंगाने बुधवार, ५ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार पूर्ववत झाले. दुसरीकडे बाजार समित्या बुधवारपासून पूर्ववत होणार, याची कल्पना शेतकºयांना नसल्याने बुधवारी फारशी आवक नसल्याचे दिसून आले.आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करणाºया व्यापाºयांचा परवाना रद्द करण्याची तरतूद बाजार समिती कायद्याच्या कलम २९ अन्वये पूर्वीपासूूनच लागू आहे. यामध्ये सुधारणा करून कायद्याचा भंग करणाºया व्यापाºयास एक वर्षाची कैद व ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आल्याचा तोंडी संदेश २५ आॅगस्टदरम्यान व्यापाºयांपर्यत पोहोचला होता. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी व्यापाºयांनी २७ आॅगस्टला रोजी बाजार समित्यांकडे पत्रव्यवहार करून शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हापासून मानोºयाचा अपवाद वगळता उर्वरीत बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद होते. त्यानंतर पणन संचालनालयाने भूमिका स्पष्ट करीत व्यापाºयांनी शेतमाल खरेदी पूर्ववत करावी, असे आवाहन केले होते. आधारभूत किंमत नव्हे; तर वैधानिक अधिमुल्यांकित किंमतीबाबतचा (एसएमपी) तो निर्णय असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३० आॅगस्ट रोजी स्पष्ट केले होते. मात्र, जोपर्यंत अधिकृत तथा लेखी निर्णय हातात पडत नाही, तोपर्यंत शेतमाल खरेदी केली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा व्यापाºयांनी घेतला होता. १ सप्टेंबर रोजी पणन संचालनालयाने जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविलेल्या लेखी पत्रात अधिनियम १९६३ व १९६७ मध्ये हमीदरापेक्षा कमी दराने व्यापाºयांनी शेतमाल खरेदी केल्यास दंडाची अथवा शिक्षेची कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे व्यापाºयांनी शेतमाल खरेदी पुर्ववत सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने कारंजा बाजार समितीचे व्यवहार ३ सप्टेंबरपासून पूर्ववत झाले होते तर उर्वरीत वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी बंद होती. ४ सप्टेंबर रोजी बाजार समिती प्रशासन व व्यापाºयांमध्ये झालेल्या यशस्वी चर्चेनुसार, ५ सप्टेंबरपासून रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर येथील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी पूर्ववत झाली.मंगरूळपीर व वाशिम येथे पहिल्याच दिवशी नवीन मूग विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. रिसोड येथे बाजार समिती पूर्ववत होणार असल्याची कल्पना शेतकºयांना नसल्याने फारशी आवक नसल्याचे दिसून आले. मालेगाव येथेही हीच परिस्थिती दिसून आली.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम