शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

वाशिम जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:46 IST

५ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार पूर्ववत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हमीदराने शेतमाल खरेदी न केल्यास व्यापाºयांवर कारवाईची कुठलीही तरतूद नसल्याने, व्यापाºयांनी शेतमालाची खरेदी पुर्ववत सुरू करण्यासंदर्भातील पणन संचालनालयाचे पत्र जिल्हा उपनिबंधकांमार्फत व्यापाºयांना प्राप्त झाले. त्याअनुषंगाने बुधवार, ५ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार पूर्ववत झाले. दुसरीकडे बाजार समित्या बुधवारपासून पूर्ववत होणार, याची कल्पना शेतकºयांना नसल्याने बुधवारी फारशी आवक नसल्याचे दिसून आले.आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करणाºया व्यापाºयांचा परवाना रद्द करण्याची तरतूद बाजार समिती कायद्याच्या कलम २९ अन्वये पूर्वीपासूूनच लागू आहे. यामध्ये सुधारणा करून कायद्याचा भंग करणाºया व्यापाºयास एक वर्षाची कैद व ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आल्याचा तोंडी संदेश २५ आॅगस्टदरम्यान व्यापाºयांपर्यत पोहोचला होता. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी व्यापाºयांनी २७ आॅगस्टला रोजी बाजार समित्यांकडे पत्रव्यवहार करून शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हापासून मानोºयाचा अपवाद वगळता उर्वरीत बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद होते. त्यानंतर पणन संचालनालयाने भूमिका स्पष्ट करीत व्यापाºयांनी शेतमाल खरेदी पूर्ववत करावी, असे आवाहन केले होते. आधारभूत किंमत नव्हे; तर वैधानिक अधिमुल्यांकित किंमतीबाबतचा (एसएमपी) तो निर्णय असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३० आॅगस्ट रोजी स्पष्ट केले होते. मात्र, जोपर्यंत अधिकृत तथा लेखी निर्णय हातात पडत नाही, तोपर्यंत शेतमाल खरेदी केली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा व्यापाºयांनी घेतला होता. १ सप्टेंबर रोजी पणन संचालनालयाने जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविलेल्या लेखी पत्रात अधिनियम १९६३ व १९६७ मध्ये हमीदरापेक्षा कमी दराने व्यापाºयांनी शेतमाल खरेदी केल्यास दंडाची अथवा शिक्षेची कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे व्यापाºयांनी शेतमाल खरेदी पुर्ववत सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने कारंजा बाजार समितीचे व्यवहार ३ सप्टेंबरपासून पूर्ववत झाले होते तर उर्वरीत वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी बंद होती. ४ सप्टेंबर रोजी बाजार समिती प्रशासन व व्यापाºयांमध्ये झालेल्या यशस्वी चर्चेनुसार, ५ सप्टेंबरपासून रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर येथील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची खरेदी पूर्ववत झाली.मंगरूळपीर व वाशिम येथे पहिल्याच दिवशी नवीन मूग विक्रीसाठी आल्याचे दिसून आले. रिसोड येथे बाजार समिती पूर्ववत होणार असल्याची कल्पना शेतकºयांना नसल्याने फारशी आवक नसल्याचे दिसून आले. मालेगाव येथेही हीच परिस्थिती दिसून आली.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम