शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अडाण प्रकल्पाचे पाचही दरवाजे उघडले; शंभर टक्के साठा: प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग

By नंदकिशोर नारे | Updated: September 26, 2023 15:38 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला आहे.

वाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कारंजा-मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पात शंभर टक्के साठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे नियंत्रण असलेला यवतमाळ पाटबंधारे विभाग सतर्क झाला असून, मंगळवारी सकाळपासूनच या प्रकल्पाचे पाचही दरवाजे प्रत्येकी ५ सेंटीमिटरने उघडून त्यातून प्रति सेकंद ३०.४३ घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

अडाण हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे सनियंत्रण यवतमाळ पाटबंधारे विभागांतर्गत येते. मागील तीन दिवसांपासून या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने प्रकल्पाच्या साठ्यात वाढ होत आहे. गत १५ जुलै आणि २२ जुलै रोजीही या प्रकल्पात साठा वाढल्याने या धरणाचे पाचही उघडून २० विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी या प्रकल्पात १०० टक्के साठा झाल्याने पाचही दरवाजे ५ सेंटिमीटरने उघडण्यात आले होते. या पाचही दरवाजातून प्रति सेकंद ३०.४३ घनमिटरचा विसर्ग करण्यात येत होता.तर विसर्ग आणखी वाढविणार

अडाण प्रकल्पात अचानक साठा वाढल्याने पाटबंधारे विभागाने पातळी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे पाचही दरवाजे मंगळवारीरी सकाळीच प्रत्येकी ७० सेंटीमिटरने उघडत त्यातून प्रति सेेकंद ३०.४३ घनमिटर पाण्याचा विसर्ग सुरू केला. तथापि, जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच आहे. यामुळे प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.परिस्थितीवर यवतमाळ पाटबंधारे विभागाचे लक्ष

अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अडाण नदीला पूर येऊन प्रकल्पातील पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अशात धोक्याच्या पातळीपर्यंत पाणीसाठा वाढू नये म्हणून यवतमाळ पाटबंधारे विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी पाटबंधारे विभागाचे सहअभियंता प्रकल्पावर तळ ठोकून बसले आहेत.