शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

महसूल व कृषिमंत्र्यांच्या दौ-यानंतरही शेतक-यांना मदतीची प्रतीक्षाच

By admin | Updated: November 24, 2014 01:59 IST

५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाचे आश्‍वासनाची पुर्तता कधी?

अकोला - शेतकर्‍यांच्या मालाचे कृषी मूल्य आयोगाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा ५0 टक्के अधिक नफा मिळेल, एवढे दर शे तीमालाला देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. या घोषणेवर आता भाजप सत्तेत आल्यानंतर कधी अंमलबजावणी केली जाते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान शेती विकास आणि शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी कृषी मूल्य आयोगातर्फे निर्धारित करण्यात येणार्‍या दरात शेतकर्‍यांना उत्पादनासाठी लागणार्‍या खर्चाचा विचार करून ५0 टक्के नफा मिळेल, याचा विचार करून हमीभाव निर्धारित केले जातील, ही प्रमुख घोषणा होती. या घोषणेवर भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार कधी अंमलबजावणी करणार किंवा यापूर्वीच्या सरकारप्रमाणेच याही सरकारकडून केवळ आश्‍वासनच दिले जाईल, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. आधुनिक शहर निर्माण करणे, मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, सुपर मार्केट, एफडीआय यासारख्या घोषणांसोबतच शेतकर्‍यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या ५0 टक्के नफ्यावर आधारित हमीभावाची घोषणा केल्यास शेतकर्‍यांसाठी अच्छे दिन येतील. त्यासाठी राज्यातील कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.