शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

पाणीटंचाई नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 16:22 IST

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायतच्यावतीने तात्पुरत्या योजनेचे प्रस्ताव जिल्हाप्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. शहराची तहान भागविण्यासाठी १२००० हजार लीटर क्षमतेच्या ९ टँकरने शहरात दरदिवशी पाणी पुरवठा करण्याची योजना आखली. त्याशिवाय शहरातील हातपंप दुरुस्तीची मोहिम प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे.

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.गतवर्षी वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यातच मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे जलसाठ्यांनी हिवाळ्यांतच तळ गाठला आणि नागरिकांना पाणीटंचाईची समस्या त्रस्त करू लागली. या समस्येवर नियंत्रणासाठी मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायतच्यावतीने तात्पुरत्या योजनेचे प्रस्ताव जिल्हाप्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर शहरासाठी मालेगाव तालुक्यातील सोनल धरणातून मोतसावंगा धरणात पाणी आणण्यासाठी ४ कोटीची योजना, तर मालेगाव शहरासाठी चाकातिर्थ प्रकल्पातून कुरळाधरणात पाणी आणण्यासाठी १.३७ कोटी रुपयांच्या योजनेचा समावेश आहे. या दोन्ही योजनांना शासनाची मंजुरी मिळाली आणि मालेगावच्या तात्पुरत्या योजनेचे कामही झाले; परंतु धिसाडघाईने केलेले हे काम अंगलट आले. या योजनेत जुन्या पाईपचा वापर करण्यात आल्याने शहरात या योजनेचे पाणी येण्यास मोठा विलंब लागत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे नगर पंचायत महिन्याकाठी १० लाख रुपये खर्चून नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत. तथापि, तात्पुरत्या योजनेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठीही त्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मंगरुळपीर शहराची तात्पुरती योजना वेळेत पूर्ण होण्याची शाश्वती नसल्याने गत महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेला स्थगिती दिली. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आणि मोतसावंगा धरणात पाणीच नसल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला. आता नगर पालिका प्रशासनाने शहराची तहान भागविण्यासाठी १२००० हजार लीटर क्षमतेच्या ९ टँकरने शहरात दरदिवशी पाणी पुरवठा करण्याची योजना आखली असून, यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्याशिवाय पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही लगेचच पाणीटंचाई मिटण्याची शक्यता नसल्याने पालिका प्रशासनाकडून तात्पुरत्या योजनेस वाढीव मुदत मिळविण्याचाही प्रयत्न करीत आहे. त्याशिवाय शहरातील हातपंप दुरुस्तीची मोहिम प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे.

टॅग्स :WaterपाणीMangrulpirमंगरूळपीरMalegaonमालेगांव