शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 16:22 IST

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायतच्यावतीने तात्पुरत्या योजनेचे प्रस्ताव जिल्हाप्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. शहराची तहान भागविण्यासाठी १२००० हजार लीटर क्षमतेच्या ९ टँकरने शहरात दरदिवशी पाणी पुरवठा करण्याची योजना आखली. त्याशिवाय शहरातील हातपंप दुरुस्तीची मोहिम प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे.

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे.गतवर्षी वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यातच मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे जलसाठ्यांनी हिवाळ्यांतच तळ गाठला आणि नागरिकांना पाणीटंचाईची समस्या त्रस्त करू लागली. या समस्येवर नियंत्रणासाठी मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायतच्यावतीने तात्पुरत्या योजनेचे प्रस्ताव जिल्हाप्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर शहरासाठी मालेगाव तालुक्यातील सोनल धरणातून मोतसावंगा धरणात पाणी आणण्यासाठी ४ कोटीची योजना, तर मालेगाव शहरासाठी चाकातिर्थ प्रकल्पातून कुरळाधरणात पाणी आणण्यासाठी १.३७ कोटी रुपयांच्या योजनेचा समावेश आहे. या दोन्ही योजनांना शासनाची मंजुरी मिळाली आणि मालेगावच्या तात्पुरत्या योजनेचे कामही झाले; परंतु धिसाडघाईने केलेले हे काम अंगलट आले. या योजनेत जुन्या पाईपचा वापर करण्यात आल्याने शहरात या योजनेचे पाणी येण्यास मोठा विलंब लागत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा झालेला नाही. त्यामुळे नगर पंचायत महिन्याकाठी १० लाख रुपये खर्चून नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत. तथापि, तात्पुरत्या योजनेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठीही त्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मंगरुळपीर शहराची तात्पुरती योजना वेळेत पूर्ण होण्याची शाश्वती नसल्याने गत महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेला स्थगिती दिली. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आणि मोतसावंगा धरणात पाणीच नसल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला. आता नगर पालिका प्रशासनाने शहराची तहान भागविण्यासाठी १२००० हजार लीटर क्षमतेच्या ९ टँकरने शहरात दरदिवशी पाणी पुरवठा करण्याची योजना आखली असून, यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्याशिवाय पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही लगेचच पाणीटंचाई मिटण्याची शक्यता नसल्याने पालिका प्रशासनाकडून तात्पुरत्या योजनेस वाढीव मुदत मिळविण्याचाही प्रयत्न करीत आहे. त्याशिवाय शहरातील हातपंप दुरुस्तीची मोहिम प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे.

टॅग्स :WaterपाणीMangrulpirमंगरूळपीरMalegaonमालेगांव