शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पाणीटंचाई निवारणार्थ  प्रशासनाची चाचपणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:29 IST

वाशिम: यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य  पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या  माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद  अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा घेऊन  पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना  सोमवारी संबंधित यंत्रणेला केल्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अहवाल सादर करण्याच्या सूचना 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने संभाव्य  पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींच्या  माध्यमातून चाचपणी चालविली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद  अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनीदेखील आढावा घेऊन  पाणीटंचाई संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना  सोमवारी संबंधित यंत्रणेला केल्या.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही.  पावसात सातत्य नसल्याने जलप्रकल्पांतदेखील समाधानकारक  जलसाठा होऊ शकला नाही. ग्रामीण भागात तर आतापासूनच  विदारक परिस्थिती आहे. जिल्हय़ात एकूण ४९१ ग्रामपंचायती  असून, जानेवारीपासून नेमक्या किती गावांत पाणीटंचाई जाणवू  शकते, याचा अंदाज जिल्हा परिषद प्रशासनातर्फे बांधला जात  आहे. उन्हाळ्यात किती गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उ पाययोजना राबवायच्या, जलस्रोतांची स्थिती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना,  किती गावांत विहीर अधिग्रहणाची गरज आहे,  बोअरवेलची परिस्थिती कशी आहे, हातपंप दुरुस्ती, वीज  देयकाचा भरणा न केल्याने बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना,  किती गावांत टँकरची गरज आहे, आदींसंदर्भात ग्रामपंचायतींनी  आतापासूनच नियोजन करून पंचायत समितीच्या माध्यमातून  जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात  आल्या. ग्रामपंचायतींचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर टंचाईग्रस्त  गावांची संख्या समोर येणार आहे.ग्रामीण भागात विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने  हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईचे संकट घोंघावण्याची शक्यता  नाकारता येत नाही. हिवाळय़ापासून किती गावांत पाणीटंचाई  निर्माण होऊ शकते, याचा अंदाज बांधून तसेच संभाव्य  पाणीटंचाई लक्षात घेता पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतींनी  चाचपणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याच्या सूचना  देण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी  प्रशासकीय आढावा घेऊन पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात  कुणाचीही हयगय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने जलयुक्त  शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या  गावातही यावर्षी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविली जात  आहे. अशा गावांमध्ये टँकरसाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर  केल्यास, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना  राबविणे आवश्यक ठरते. गतवेळचा अनुभव बघता, काही ग्राम  पंचायतींनी टँकरचे प्रस्ताव पाठवूनही जिल्हा प्रशासनाने त्याला  मंजुरी दिली नव्हती. या प्रकाराची पुनरावृत्ती यावर्षी होऊ नये,  अशी अपेक्षा टंचाईग्रस्त गावातील नागरिक बाळगून आहेत. 

विहीर, बोअरवेल अधिग्रहणावर भरपाणीटंचाई निवारणार्थ संबंधित गावात विहीर व बोअरवेल  अधिग्रहण करण्यावर भर दिला जात आहे. अधिग्रहण केल्यानं तर संबंधित विहीर किंवा बोअरवेलच्या ठिकाणी ‘अधिग्रहित  विहीर’ असा फलकही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषद