शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

तूर मोजणीसाठी प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:45 IST

वाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देचार दिवसांत केवळ साडेसहा हजार क्विंटल तूर मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जिल्ह्यात २६ जुलैपासून तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु मागील चार दिवसांत ६ केंद्रावर मिळून ३७५ शेतकºयांची मिळून केवळ ६ हजार ६९४ क्विंटल तुरीची मोजणी प्रशासनाला शक्य झाली आहे. प्रशासनाची तूर मोजणीसाठी कसरत होत असून, मोजणी संथगतीने होत असल्यामुळे शेतकºयांना खरिपाच्या हंगामात शेतीवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात ३१ मेपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांपैकी १४ हजार ५४२ शेतकºयांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर मोजणी बाकी होती; परंतु या शेतकºयांची तूर मोजणी होण्यापूर्वीच शासनाने शासकीय खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधी पक्षांसह शेतकºयांच्यावतीने या संदर्भात वेगवेगळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार शासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तूर मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर मोजून घेण्याचा निर्णय २३ जुलै रोजी जाहीर केला.त्या निर्णयातील सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत टोकनधारक शेतकºयांकडे असलेली शिल्लक तुरीची पडताळणी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि गट सचिवाचा समावेश असलेले पथक सहाही तालुक्यात नियुक्त केले. त्या पथकाच्या तपासणीनुसार २६ जुलैपासून जिल्ह्यातील मालेगाव, वाशिम, कारंजा आणि अनसिंग या चार ठिकाणी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासकीय तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी मंगरुळपीर आणि रिसोड येथेही ही खरेदी सुरू करण्यात आली; परंतु मागील चार दिवसांत सहाही केंद्रांवर मिळून केवळ ३ हजार ७६७ क्विंटल तूर या केंद्रांवर मोजण्यात आली. आता खरिपाच्या हंगामात शेतकºयांना शेतीकडे लक्ष देणे आवश्यक असताना तूर मोजणीला विलंब लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.अद्यापही जिल्ह्यात १४ हजार ३२९ टोकनधारक शेतकºयांची २ लाख ८० हजार ७६९ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. या तुरीच्या मोजणीला विलंब लागणार असल्याने शेतकºयांना खरीप हंगामातील पिकांची देखभाल करणे, थकीत कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणे, तसेच पीक विमा उतरविण्याची कामे करणे कठीण झाले आहे. त्यातच पीक विमा भरण्याची मुदत ३१ जुलै असल्याने अनेक शेतकºयांची पंचाईत झाली आहे. तूर मोजणी केंद्रावर थांबावे, पीक कर्जमाफीसाठी अर्ज सादर करावा की शेतीकडे लक्ष द्यावे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहेत.मुदतवाढीचा टोकनधारक शेतकºयांना आधारशासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकºयांची तूर मोजण्यासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. तथापि, केवळ सात दिवसांत शिल्लक राहिलेली पावणे तीन लाख क्विंटलच्यावर तूर मोजून घेणे कठीण असल्याने विविध स्तरावरून शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. शासनाने याबाबीचा सारासार विचार करून टोकनधारक शेतकºयांच्या शिल्लक राहिलेल्या तुरीच्या मोजणीसाठी आता ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे टोकनधारक शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.शासनाच्या निर्णयानुसार टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घ्यावी लागणार आहे. तूर पडताळणीसाठी नियुक्त केलेले पथक शेतकºयांकडून माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहे. मर्यादित मनुष्यबळापोटी सद्यस्थितीत तूर मोजणी वेगात होऊ शकली नाही; परंतु निर्धारित मुदतीच्या खूप आधी जिल्ह्यातील सर्वच टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घेतली जाईल.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम