शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

तूर मोजणीसाठी प्रशासनाची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:45 IST

वाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देचार दिवसांत केवळ साडेसहा हजार क्विंटल तूर मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तुरीची मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जिल्ह्यात २६ जुलैपासून तूर खरेदीला सुरुवात झाली; परंतु मागील चार दिवसांत ६ केंद्रावर मिळून ३७५ शेतकºयांची मिळून केवळ ६ हजार ६९४ क्विंटल तुरीची मोजणी प्रशासनाला शक्य झाली आहे. प्रशासनाची तूर मोजणीसाठी कसरत होत असून, मोजणी संथगतीने होत असल्यामुळे शेतकºयांना खरिपाच्या हंगामात शेतीवर लक्ष केंद्रित करणे कठीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.जिल्ह्यात ३१ मेपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणणाºया शेतकºयांपैकी १४ हजार ५४२ शेतकºयांची २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर मोजणी बाकी होती; परंतु या शेतकºयांची तूर मोजणी होण्यापूर्वीच शासनाने शासकीय खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विरोधी पक्षांसह शेतकºयांच्यावतीने या संदर्भात वेगवेगळी आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार शासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या आणि तूर मोजणी बाकी असलेल्या शेतकºयांची तूर मोजून घेण्याचा निर्णय २३ जुलै रोजी जाहीर केला.त्या निर्णयातील सूचनेनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत टोकनधारक शेतकºयांकडे असलेली शिल्लक तुरीची पडताळणी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक आणि गट सचिवाचा समावेश असलेले पथक सहाही तालुक्यात नियुक्त केले. त्या पथकाच्या तपासणीनुसार २६ जुलैपासून जिल्ह्यातील मालेगाव, वाशिम, कारंजा आणि अनसिंग या चार ठिकाणी बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत शासकीय तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी मंगरुळपीर आणि रिसोड येथेही ही खरेदी सुरू करण्यात आली; परंतु मागील चार दिवसांत सहाही केंद्रांवर मिळून केवळ ३ हजार ७६७ क्विंटल तूर या केंद्रांवर मोजण्यात आली. आता खरिपाच्या हंगामात शेतकºयांना शेतीकडे लक्ष देणे आवश्यक असताना तूर मोजणीला विलंब लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.अद्यापही जिल्ह्यात १४ हजार ३२९ टोकनधारक शेतकºयांची २ लाख ८० हजार ७६९ क्विंटल तूर मोजणे बाकी आहे. या तुरीच्या मोजणीला विलंब लागणार असल्याने शेतकºयांना खरीप हंगामातील पिकांची देखभाल करणे, थकीत कर्जमाफीसाठी अर्ज सादर करणे, तसेच पीक विमा उतरविण्याची कामे करणे कठीण झाले आहे. त्यातच पीक विमा भरण्याची मुदत ३१ जुलै असल्याने अनेक शेतकºयांची पंचाईत झाली आहे. तूर मोजणी केंद्रावर थांबावे, पीक कर्जमाफीसाठी अर्ज सादर करावा की शेतीकडे लक्ष द्यावे, असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहेत.मुदतवाढीचा टोकनधारक शेतकºयांना आधारशासनाने ३१ मेपर्यंत टोकन घेतलेल्या शेतकºयांची तूर मोजण्यासाठी सुरुवातीला ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. तथापि, केवळ सात दिवसांत शिल्लक राहिलेली पावणे तीन लाख क्विंटलच्यावर तूर मोजून घेणे कठीण असल्याने विविध स्तरावरून शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. शासनाने याबाबीचा सारासार विचार करून टोकनधारक शेतकºयांच्या शिल्लक राहिलेल्या तुरीच्या मोजणीसाठी आता ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे टोकनधारक शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे.शासनाच्या निर्णयानुसार टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घ्यावी लागणार आहे. तूर पडताळणीसाठी नियुक्त केलेले पथक शेतकºयांकडून माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहे. मर्यादित मनुष्यबळापोटी सद्यस्थितीत तूर मोजणी वेगात होऊ शकली नाही; परंतु निर्धारित मुदतीच्या खूप आधी जिल्ह्यातील सर्वच टोकनधारक शेतकºयांची तूर मोजून घेतली जाईल.- रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, वाशिम