शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

पावसाअभावी खरिपासोबतच रब्बीवरही घोंगावतेय संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:38 IST

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ६० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. याशिवाय पावसाअभावी खरिप हंगामातील पिकांना जबर फटका बसला असून आगामी रब्बी हंगामावरही संकट घोंगावत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देसिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाहीपावसाअभावी खरिप हंगामातील पिकांना जबर फटका 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कागदावर ६० टक्क्याच्या आसपास पाऊस कोसळल्याचे दिसत असले तरी हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा आणि जमिनीत मुरणारा नसल्यामुळे सिंचन प्रकल्पांसह इतर सर्वच जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढलेली नाही. याशिवाय पावसाअभावी खरिप हंगामातील पिकांना जबर फटका बसला असून आगामी रब्बी हंगामावरही संकट घोंगावत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात यंदा ४.५ लाख हेक्टरच्या जवळपास खरिप हंगामातील सोयााबिन, उडिद, मूग यासह इतर पिकांची पेरणी झालेली आहे. मृगनक्षत्रादरम्यान चांगला पाऊस झाल्याने यंदा चांगले उत्पादन होईल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकºयांना पावसाने मात्र त्यानंतरच्या काळात मोठा दगा दिला. पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होण्यासोबतच नापिकीचे संकट शेतकºयांसमक्ष उभे ठाकले आहे. यासह सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी प्रचंड प्रमाणात खालावल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार असून रब्बी हंगामही धोक्यात सापडला आहे.