शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

आठवडी बाजार भरल्यास ग्रामसेवकावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण हा ग्रामीण भागात आढळला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख ...

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण हा ग्रामीण भागात आढळला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख उंचावला होता. त्यानंतर जानेवारी २०२१ पर्यंत कोरोनाबाधितांचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा आलेख पुन्हा उंचावला असून, गत १५ दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या चांगलीच वाढली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील सर्व आठवडी बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मनाई केली आहे. यानंतरही काही ठिकाणी आठवडी बाजार भरत असल्याची माहिती समोर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही गावात आठवडी बाजार भरवले जाणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा परिषदेने घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. संबंधित गावात आठवडी बाजार भरणार नाही, याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवकावर सोपविली असून, आठवडी बाजार भरल्यास संबंधित ग्रामसेवकाला जबाबदार धरून कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.