शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 12:48 IST

वाशिम : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ९ जुलै २०१८ रोजी सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या होत्या.

वाशिम : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ९ जुलै २०१८ रोजी सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या होत्या. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने २९ आॅगस्ट रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढाव्या, त्यांच्या व्यथा जाणून लवकरात लवकर न्याय मिळावा, यादृष्टीने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये सुस्पष्टता येण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व जिल्हा प्रशासनाला या धोरणाच्या अनुषंगाने योग्य ती अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी प्राप्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा करावा, असे निर्देश देऊन समस्यांचा निपटारा करण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचे बजावले आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, कार्यालये, समाज मंदिरे, विरंगुळा केंद्रे येथील जागा ठरावीक दिवशी ठरावीक वेळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ती कार्यवाही करावी लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची आस्थापूर्वक सोडवणूक होण्यासाठी व विविध विभागामार्फत राबविण्याच्या योजनांचे संनियंत्रण व्हावे, याकरिता सामाजिक न्याय विभाग व सर्व शासकीय विभागांनी समन्वयातून ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यावा, अशा सूचना जिल्हास्तरीय सामाजिक न्याय विभागासह जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आल्या.शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रमाने निपटारा केला जाईल, असे वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरुवारी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना