शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

कृती आराखड्यास दिरंगाई

By admin | Updated: January 22, 2017 02:57 IST

पंचायत समिती स्तरावर विलंब; मंजुरीसाठी आता जाणार जिल्हाधिका-यांच्या दरबारात

वाशिम, दि. २१- संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून डिसेंबर महिन्यात तयार होणारा पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा यावर्षी जानेवारीच्या पंधरवड्यातही अंतिम झाला नाही. पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंब झाल्याने आता हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात ठेवला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे.गत तीन वर्षांपासून जिल्हा कोरड्या दुष्काळाला सामोरे गेला आहे. यापूर्वीच्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक गावांनी पाण्याचे चटके सोसले आहेत. २0१६ मध्ये बर्‍यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी पाणीटंचाईची तीव्रताही कमी राहिल, असा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे. नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उ पाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. साधारणत: डिसेंबर महिन्यात या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाते. त्यानुसार टंचाईग्रस्त गावात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी २0 जानेवारी उजाडला असतानाही, पाणीटंचाई कृती आराखडा चर्चेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात पोहोचला नाही, अशी माहिती आहे. पंचायत समिती स्तरावरूनच दिरंगाई झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात मंजुरीसाठी हा आराखडा ठेवला जाणार असल्याचे सूत्र आहे. १५ दिवसांपूर्वी मालेगाव पंचायत समिती येथे पाणीटंचाईवरूनच महिलांनी बीडीओ व ग्रामसेवकाच्या दिशेने बांगड्या फेकून दप्तरदिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला होता.