शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कृती आराखड्यास दिरंगाई

By admin | Updated: January 22, 2017 02:57 IST

पंचायत समिती स्तरावर विलंब; मंजुरीसाठी आता जाणार जिल्हाधिका-यांच्या दरबारात

वाशिम, दि. २१- संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून डिसेंबर महिन्यात तयार होणारा पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा यावर्षी जानेवारीच्या पंधरवड्यातही अंतिम झाला नाही. पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंब झाल्याने आता हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात ठेवला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे.गत तीन वर्षांपासून जिल्हा कोरड्या दुष्काळाला सामोरे गेला आहे. यापूर्वीच्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक गावांनी पाण्याचे चटके सोसले आहेत. २0१६ मध्ये बर्‍यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी पाणीटंचाईची तीव्रताही कमी राहिल, असा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे. नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उ पाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. साधारणत: डिसेंबर महिन्यात या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाते. त्यानुसार टंचाईग्रस्त गावात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी २0 जानेवारी उजाडला असतानाही, पाणीटंचाई कृती आराखडा चर्चेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात पोहोचला नाही, अशी माहिती आहे. पंचायत समिती स्तरावरूनच दिरंगाई झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात मंजुरीसाठी हा आराखडा ठेवला जाणार असल्याचे सूत्र आहे. १५ दिवसांपूर्वी मालेगाव पंचायत समिती येथे पाणीटंचाईवरूनच महिलांनी बीडीओ व ग्रामसेवकाच्या दिशेने बांगड्या फेकून दप्तरदिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला होता.