शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कृती आराखड्यास दिरंगाई

By admin | Updated: January 22, 2017 02:57 IST

पंचायत समिती स्तरावर विलंब; मंजुरीसाठी आता जाणार जिल्हाधिका-यांच्या दरबारात

वाशिम, दि. २१- संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजना म्हणून डिसेंबर महिन्यात तयार होणारा पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा यावर्षी जानेवारीच्या पंधरवड्यातही अंतिम झाला नाही. पंचायत समिती स्तरावरून प्रचंड विलंब झाल्याने आता हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात ठेवला जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्र आहे.गत तीन वर्षांपासून जिल्हा कोरड्या दुष्काळाला सामोरे गेला आहे. यापूर्वीच्या पावसाळ्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने हिवाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक गावांनी पाण्याचे चटके सोसले आहेत. २0१६ मध्ये बर्‍यापैकी पाऊस झाल्याने यावर्षी पाणीटंचाईची तीव्रताही कमी राहिल, असा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे. नेमक्या किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार, टंचाईग्रस्त गावांमध्ये कोणत्या उ पाययोजना प्रस्तावित करणार, यासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणीचा कालावधी आदींबाबत पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. साधारणत: डिसेंबर महिन्यात या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाते. त्यानुसार टंचाईग्रस्त गावात उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी २0 जानेवारी उजाडला असतानाही, पाणीटंचाई कृती आराखडा चर्चेसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात पोहोचला नाही, अशी माहिती आहे. पंचायत समिती स्तरावरूनच दिरंगाई झाल्याने येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारात मंजुरीसाठी हा आराखडा ठेवला जाणार असल्याचे सूत्र आहे. १५ दिवसांपूर्वी मालेगाव पंचायत समिती येथे पाणीटंचाईवरूनच महिलांनी बीडीओ व ग्रामसेवकाच्या दिशेने बांगड्या फेकून दप्तरदिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला होता.