शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

रेशन धान्य दुकानांसदर्भातील तक्रारींच्या निपटाऱ्यास सर्वोच्च प्राधान्य- राजेंद्रसिंग जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:48 IST

जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. या दरम्यान शासनाने पात्र लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वितरीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सुरूवातीच्या काळात अंगठा पद्धतीला दुकानदारांचा विरोध, त्यानंतर नियमाचे उल्लंघन, दुकानांसमोर लाभार्थींच्या रांगा, स्थलांतरीत तसेच शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण , तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरारी पथकाचे गठण आदीसंदर्भात  जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..

लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात लाभार्थींवा अंगठा घेण्याच्या पद्धतीला रेशन दुकानदारांचा विरोध होता. सदर प्रकरण कसे हाताळले?कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लाभार्थींचे अंगठे घेण्याला रेशन दुकानदारांचा राज्यभरातच विरोध होता. अंगठे न घेता धान्य वितरणाला परवानगी मिळाल्याने हा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला. रेशन दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागू नये आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे याकरीता शिक्षकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

 प्राधान्य गटातील किती लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वाटप सुरू आहे?प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून महिन्याचे मोफत तांदळाचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यात प्राधान्य गटात १ लाख ७७ हजार तर अंत्योदय गटात जवळपास ४८ हजार शिधापत्रिकाधारक आहेत.

अनेक दुकानदार नियमांचे पालन करीत नाहीत, याबाबत काय सांगाल?नियमांचे पालन न करणाºयावर कारवाईची मोहिम सुरू आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एकूण २४ दुकानांविरूद्ध कारवाई केली. यामध्ये १२ दुकाने रद्द, दोन दुकाने निलंबित, १० दुकानांची अनामत जप्त करून सुधारणा करण्याची ताकीद दिली. नियमाचे पालन प्रत्येक दुकानदाराने करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा होतो काय?रेशन धान्य वितरण व रेशन दुकानासंदर्भात लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकाचे गठण करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारीनुसार पडताळणी करून दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाते. आतापर्यंत या पथकाकडे २४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दोषी आढळून आलेल्या दुकानदारांविरूद्ध कारवाईदेखील करण्यात आली आहे.

स्थलांतरीत तसेच शिधापत्रिकाधारक नसलेल्या लाभार्थींना मोफत तांदूळ व दाळ वितरीत करण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत. स्थलांतरीत, शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचा आकडा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले. जिल्ह्यात ७९३ कुटुंबातील १४ हजार २९१ नागरीक आहेत. या नागरिकांनादेखील मोफत तांदूळ व दाळ वितरणाचा लाभ दिला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत