शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

रेशन धान्य दुकानांसदर्भातील तक्रारींच्या निपटाऱ्यास सर्वोच्च प्राधान्य- राजेंद्रसिंग जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:48 IST

जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. या दरम्यान शासनाने पात्र लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वितरीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सुरूवातीच्या काळात अंगठा पद्धतीला दुकानदारांचा विरोध, त्यानंतर नियमाचे उल्लंघन, दुकानांसमोर लाभार्थींच्या रांगा, स्थलांतरीत तसेच शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचे सर्वेक्षण , तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भरारी पथकाचे गठण आदीसंदर्भात  जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्रसिंग जाधव यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद..

लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात लाभार्थींवा अंगठा घेण्याच्या पद्धतीला रेशन दुकानदारांचा विरोध होता. सदर प्रकरण कसे हाताळले?कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लाभार्थींचे अंगठे घेण्याला रेशन दुकानदारांचा राज्यभरातच विरोध होता. अंगठे न घेता धान्य वितरणाला परवानगी मिळाल्याने हा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला. रेशन दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागू नये आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे याकरीता शिक्षकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

 प्राधान्य गटातील किती लाभार्थींना मोफत तांदूळ, दाळ वाटप सुरू आहे?प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून महिन्याचे मोफत तांदळाचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यात प्राधान्य गटात १ लाख ७७ हजार तर अंत्योदय गटात जवळपास ४८ हजार शिधापत्रिकाधारक आहेत.

अनेक दुकानदार नियमांचे पालन करीत नाहीत, याबाबत काय सांगाल?नियमांचे पालन न करणाºयावर कारवाईची मोहिम सुरू आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत एकूण २४ दुकानांविरूद्ध कारवाई केली. यामध्ये १२ दुकाने रद्द, दोन दुकाने निलंबित, १० दुकानांची अनामत जप्त करून सुधारणा करण्याची ताकीद दिली. नियमाचे पालन प्रत्येक दुकानदाराने करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा होतो काय?रेशन धान्य वितरण व रेशन दुकानासंदर्भात लाभार्थींच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकाचे गठण करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारीनुसार पडताळणी करून दोषी आढळून आल्यास कारवाई केली जाते. आतापर्यंत या पथकाकडे २४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दोषी आढळून आलेल्या दुकानदारांविरूद्ध कारवाईदेखील करण्यात आली आहे.

स्थलांतरीत तसेच शिधापत्रिकाधारक नसलेल्या लाभार्थींना मोफत तांदूळ व दाळ वितरीत करण्याचे वरिष्ठांचे निर्देश आहेत. स्थलांतरीत, शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थींचा आकडा निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केले. जिल्ह्यात ७९३ कुटुंबातील १४ हजार २९१ नागरीक आहेत. या नागरिकांनादेखील मोफत तांदूळ व दाळ वितरणाचा लाभ दिला जात आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत