शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

विनामास्क फिरणाऱ्या १०१२३ जणांवर कारवाई; ४०.६८ लाखांची दंड वसुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 13:13 IST

मोहिमेत १० हजार १२३ जणांवर कारवाई करून ४० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम:  कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासनाने काही क ठोर उपाय योजना करताना तोंडाला मास्क वा रुमाल न बांधणाºयांकडून दंड वसूल करण्याची मोहिम पोलिसांमार्फत राबविली. त्यात जिल्हाभरात पोलिसांनी सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत राबविलेल्या मोहिमेत १० हजार १२३ जणांवर कारवाई करून ४० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला. एवढी मोठी कारवाईसुद्धा जनतेच्या डोळ्यावरची धुंदी उतरविण्यास असमर्थ ठरली असून, कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच आहे. वाशिम जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत केवळ  ५९४ लोकांना कोरोना संसर्ग झाला होता.  त्यापैकी ३८६ लोकांनी कोरोनावर मात केली, तर१६ लोकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी तोंडावर मास्क वा रूमाल न बांधता फिरणाºया नागरिकांकडून २०० रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्याची कठोर अमलबजावणी पोलिसांनी केली आणि ३३१० लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ६ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. एवढ्या कारवाईनंतरही लोकांनी २०० रुपयांसह स्वत:च्या जिवाची काळजी घेत मास्क वा रूमाल बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि जिल्हाधिकाºयांनी अगदी अनलॉकच्या काळातही तोंडाला मास्क न लावणाºयांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनीही पूवीर्पेक्षा अधिक कठोर भूमिका घेत ६ हजार ८१३ लोकांकडून ३४ लाख ६ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. अर्थात पोलिसांनी मास्क न लावणाºयांवर जिल्हाभरात दोन्ही मिळून १० हजार १२३ कारवाया करीत ४० लाख ६८ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल केले. एवढ्या गंभीर कारवाईनंतरही जिल्ह्यातील जनता अद्यापही कोरोना संसगार्बाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच जिल्ह्यात १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ३ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ५७ लोकांचा मृत्यू झाला, तर २१२८ बरे होऊन घरी परतले.  कारवाई केवळ रस्ते व चौकात कोरोना संसगार्पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने गंभीर पावले उचलली आणि कठोर कारवायासुद्धा केल्या; परंतु त्या कारवाया कोरोना रोखण्यात असमर्थच ठरल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर केवळ सार्वजनिक ठिकाणी त्यातही शहरातील मुख्य चौकांतच कारवाईचे सत्र राबविले जाते. प्रत्यक्षात शहराच्या आतील भागांत त्यापेक्षाही अधिक प्रमाणात होणारे नियमांचे उल्लंघन मात्र दुर्लक्षीतच राहते. अर्थात कारवाई होते चौकांत आणि कोरोना फिरतो गावांत, अशीच स्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम