शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
4
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
5
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
6
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
7
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
8
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
9
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
10
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
11
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
12
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
13
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
14
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
15
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
16
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
17
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
18
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
19
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
20
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

विनामास्क फिरणाऱ्या १०१२३ जणांवर कारवाई; ४०.६८ लाखांची दंड वसुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 13:13 IST

मोहिमेत १० हजार १२३ जणांवर कारवाई करून ४० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम:  कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी प्रशासनाने काही क ठोर उपाय योजना करताना तोंडाला मास्क वा रुमाल न बांधणाºयांकडून दंड वसूल करण्याची मोहिम पोलिसांमार्फत राबविली. त्यात जिल्हाभरात पोलिसांनी सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत राबविलेल्या मोहिमेत १० हजार १२३ जणांवर कारवाई करून ४० लाख ६८ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल केला. एवढी मोठी कारवाईसुद्धा जनतेच्या डोळ्यावरची धुंदी उतरविण्यास असमर्थ ठरली असून, कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्याऐवजी वाढतच आहे. वाशिम जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत केवळ  ५९४ लोकांना कोरोना संसर्ग झाला होता.  त्यापैकी ३८६ लोकांनी कोरोनावर मात केली, तर१६ लोकांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी तोंडावर मास्क वा रूमाल न बांधता फिरणाºया नागरिकांकडून २०० रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्याची कठोर अमलबजावणी पोलिसांनी केली आणि ३३१० लोकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ६ लाख ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. एवढ्या कारवाईनंतरही लोकांनी २०० रुपयांसह स्वत:च्या जिवाची काळजी घेत मास्क वा रूमाल बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि जिल्हाधिकाºयांनी अगदी अनलॉकच्या काळातही तोंडाला मास्क न लावणाºयांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनीही पूवीर्पेक्षा अधिक कठोर भूमिका घेत ६ हजार ८१३ लोकांकडून ३४ लाख ६ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. अर्थात पोलिसांनी मास्क न लावणाºयांवर जिल्हाभरात दोन्ही मिळून १० हजार १२३ कारवाया करीत ४० लाख ६८ हजार ५०० रुपये दंडापोटी वसूल केले. एवढ्या गंभीर कारवाईनंतरही जिल्ह्यातील जनता अद्यापही कोरोना संसगार्बाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच जिल्ह्यात १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ३ हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ५७ लोकांचा मृत्यू झाला, तर २१२८ बरे होऊन घरी परतले.  कारवाई केवळ रस्ते व चौकात कोरोना संसगार्पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने गंभीर पावले उचलली आणि कठोर कारवायासुद्धा केल्या; परंतु त्या कारवाया कोरोना रोखण्यात असमर्थच ठरल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर केवळ सार्वजनिक ठिकाणी त्यातही शहरातील मुख्य चौकांतच कारवाईचे सत्र राबविले जाते. प्रत्यक्षात शहराच्या आतील भागांत त्यापेक्षाही अधिक प्रमाणात होणारे नियमांचे उल्लंघन मात्र दुर्लक्षीतच राहते. अर्थात कारवाई होते चौकांत आणि कोरोना फिरतो गावांत, अशीच स्थिती आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम