शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

आरोपी मोकाट फिरताना दुर्लक्ष; आता घेतला जातोय शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:36 IST

वाशिम : ‘मग्रारोहयो’अंतर्गत मारसूळ (ता.मालेगाव) येथे झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून ३१ ...

वाशिम : ‘मग्रारोहयो’अंतर्गत मारसूळ (ता.मालेगाव) येथे झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाला. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून ३१ डिसेंबर २०२० रोजी १४ जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर बरेच दिवस आरोपी मोकाट फिरत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले; आता मात्र ते पसार झाल्यानंतर त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.

मारसूळ येथे ‘मग्रारोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये ६९ लाखांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मालेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी माधव साखरे यांनी ३१ डिसेंबर रोजी मालेगाव पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप कोटकर, कुलदीप कांबळे, संजय महागांवकर, कनिष्ठ अभियंता कैलास मगर, तांत्रिक कंत्राटी अधिकारी पवन भुते, सहायक लेखा अधिकारी सुभाष इंगळे, सहायक कार्यक्रम अधिकारी योगेश्वर तागतोडे, संगणक परिचालक विनोद आगाशे, सागर इंगोले, ग्रामसेवक संतोष खुळे, ग्रामसेविका सोनल इंगळे, नीलेश ढंगारे, रोजगार सेवक शत्रुघ्न खिल्लारे, ब्राम्हणवाडाचे सरपंच पंजाबराव घुगे अशा १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. असे असले तरी २१ दिवस उलटूनही अद्याप एकाही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.

विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर काही दिवस बरेच आरोपी मोकाट फिरत होते. त्यावेळी पोलिसांनी कुठलीही ठोस ‘अ‍ॅक्शन’ घेतली नाही आणि आता सर्वच आरोपी पसार झाले असताना त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात असल्याने उलटसुलट चर्चेला पेव फुटत आहे.

.....................

बॉक्स :

घोटाळ्यामुळे मजूर बेरोजगार; विकासालाही ठेंगा

ग्रामीण भागातील नोंदणीकृत प्रत्येक प्रौढ व्यक्तीस अकुशल रोजगाराचा हक्क मिळवून देण्यासह वित्तीय वर्षात जॉब कार्डधारक प्रत्येक मजुरास किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची निर्मिती झाली. या माध्यमातून यंत्रांशिवाय विविध स्वरूपातील विकासकामे मार्गी लावण्याचा उद्देश बाळगण्यात आला. मात्र, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच ‘मग्रारोहयो’ला भ्रष्टाचाराची कीड लावल्याने ना मजुरांना रोजगार मिळत आहे, ना विकासाची कुठलीही कामे पूर्ण होत आहेत.

...................

कोट :

मारसूळ येथील रोहयो घोटाळ्याप्रकरणी ३१ डिसेंबर रोजी १४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तेव्हापासूनच आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच बहुतांश आरोपी गजाआड झालेले दिसतील.

- आधारसिंह सोनोने

पोलीस निरीक्षक, मालेगाव पोलीस स्टेशन