शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ३३ हजार एकर क्षेत्र अद्यापही पेरणीविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:02 IST

जिल्ह्यात सुमारे ३३ हजार एकर क्षेत्रावर अद्यापपर्यंत पेरणीच झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चालू महिन्यातील २० जुलैचा अपवाद वगळता मोठ्या स्वरूपातील तथा संततधार पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात सुमारे ३३ हजार एकर क्षेत्रावर अद्यापपर्यंत पेरणीच झालेली नसून ज्या शेतकऱ्यांनी थोड्याथोडक्या पावसानंतर पेरणी केली, ती पाण्याअभावी धोक्याच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात सरासरी ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षीत असते. यंदा मात्र पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही विलंबाने सुरू झाल्या. परिणामी, सोयाबिनचा अपवाद वगळता उडिद, मुग या कडधान्य पिकांसह अन्य पिकांचे क्षेत्र घटले आहे. जिल्ह्यात ८२ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची पेरणी अपेक्षित असताना कृषी विभागाच्या २० जुलैच्या अहवालानुसार ७७ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. त्यात प्रामुख्याने तूर पिकाचे क्षेत्र ६१ हजार ९७१, उडिद पिकाचे ८ हजार ३३८, मुग पिकाचे ६ हजार ३९०, इतर कडधान्य पिकांचे क्षेत्र १ हजार १३४ हेक्टर आहे. पावसाच्या विलंबाचा मुख्य फटका तृणधान्य पिकांच्या क्षेत्रावर झाल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात आधीच जेमतेम १२ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पिकांची पेरणी अपेक्षित असताना केवळ ३ हजार ३१० हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. त्यात ११ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रात ज्वारीची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ८७१ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. त्याशिवाय बाजरी ९१ हेक्टर, मका ५०६ हेक्टर, तर ३८ हेक्टरवर इतर तृणधान्य पिकांची पेरणी आहे. गळीत पिकांची पेरणी २ लाख ७५ हजार २७१ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षीत असताना २ लाख ८८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन २ लाख ८८ हजार २४६ हेक्टर, तीळ ३६ हेक्टर, तर इतर पिकांचे क्षेत्र ३ हेक्टर आहे. कपाशीची पेरणी सरासरीच्या तुलनेत कमी झाली असली तरी, गतवर्षीच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढला असून, २४ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. ऊसाची ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. पेरणी झालेले एकूण क्षेत्र ३ लाख ९४ हजार ३१० हेक्टर असून, अद्यापही ३३ हजार एकर क्षेत्रावरील खरीप पेरणी प्रलंबितच असल्याचे दिसून येत आहे. आता केवळ सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात थोडी वाढ होण्याची अपेक्षा असली तरी, पेरणीची वेळ निघून जात असल्याने हजारो हेक्टर शेती पडित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तुरीच्या पेरणी क्षेत्रात झाली वाढजिल्ह्यात सरासरी ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी अपेक्षीत असते. यंदा मात्र पावसाला विलंब झाला आणि बाजारात तुरीला अपेक्षीत दर मिळत नसल्याने तुरीचे क्षेत्र कमी होण्याची भिती होती; परंतु चित्र अगदी त्याउलट असून, जिल्ह्यात ६१ हजार ९७१ हेक्टर क्षेत्रावर तुर पिकाची पेरणी झाली आहे. याशिवाय सोयाबीनच्या क्षेत्रातही वाढ झाली असून, सरासरी २ लाख ७६ हजार १९ हेक्टरवर या पिकाची पेरणी अपेक्षीत असताना २ लाख ८८ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. तथापि, अद्यापही शेतकरी पेरणी करीत आहेत. त्यामुळे खरीपाची पेरणी पूर्णच होणार असल्याची खात्री आहे. पावसाने दीर्घ खंड दिल्यास मात्र, काही निवडक शेतकरी जोखीम पत्करू शकणार नाहीत.- दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी