शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

राज्य सरकारवरील कर्ज फेडण्याची क्षमता वाढत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:15 IST

वाशिम  :  राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे, पण ते फेडण्याची क्षमता  वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्‍वास पाठक यांनी केले. ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत  बोलत होते.

ठळक मुद्देभाजपाचे प्रदेश प्रवक्ते पाठक पत्रकार परिषदेत प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  राज्य सरकारवरील कर्ज वाढले आहे, पण ते फेडण्याची क्षमता  वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्‍वास पाठक यांनी केले. ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव शहरातील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत  बोलत होते. तसेच जिल्हातील मालेगाव, वाशिम, रिसोड, मानोरा, कारंजा व मंगरुळपीर येथेही त्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जि .प. सदस्य शाम बढे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कृउबासचे संचालक गोपाल पाटील राऊत, कृउबासचे माजी उपसभापती प्रा आंनद देवळें, जिल्हा सरचिटणीस संदीप पिंपळकर यांच्यासह पदाधिाकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पाठक म्हणाले की,  राज्य शासनावर कर्जार्चा बोझा वाढला आहे. विकासकामांसाठी कर्ज काढावे लागते ते कर्ज फेडण्यासाठीची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासन करीत आहे. नोटांबंदीमुळे रियलक्ष्स्टेट मध्ये मंदी आलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे सरकारचे यश आहे. त्याचे चांगले परिणाम होणार आहेत. राज्यात फडणवीस शासनाने ३४  हजार कोटींची कर्जमाफी केली. शेतकर्‍यांसाठीच्या खर्चावर अर्थसंकल्पात वाढ केली. ३५ लाख टी. एम. सी. एवढी जलासाठ्यात वाढ झाली. १.५ लाख कृषी पंप जोडणी केल्या. राज्यात २१00 हवामान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. विजेमध्ये राज्य स्वंयपूर्ण आहे. कृषीपंपाना सौर ऊर्जा पुरविण्यात येणार असूनख् राज्यात विदेशी गुंतवणूक वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. वाशिम येथे भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत  न. प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे व सरचिटणीस संदिप पिंपरकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मानोरा येथे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष ठाकरे तर मंगरुळपीर येथे भाजपा नेते सुरेश लुंगे यांच्यसह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाची विदर्भ विकासासाठी समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या मागार्मुळे कृषी मालाला अतिशय कमी वेळात देशभर व परदेशात पोहचविता येणार आहे. समृद्धी महामागार्मुळे स्मार्ट सिटी ही संकल्पनाही पूर्णत्वास जाणार आहे. रात्रंदिवस नागरिकांच्या संरक्षणात असणार्‍या पोलिसांसाठीही अनेक योजना राबविल्या जात असून, त्यांच्या राहण्यासाठी घरे बांधण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यात कौशल्यविकासा अंतर्गत ८ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या गेले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी अडकलेली इंदू मिलची जागा मिळवून त्यामधील सर्व अडथळे या सरकारने दूर केले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामही मार्गी लागले आहे, असेही शेवटी विश्‍वास पाठक म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपा