शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

अभय योजनेतून मिळणार विजबिलात ५ टक्के सूट!

By admin | Updated: November 6, 2016 21:36 IST

महावितरणने अभय योजना अंमलात आणली असून मूळ बिलात ५ टक्के सुट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - विजेची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महावितरणने अभय योजना अंमलात आणली असून मूळ बिलात ५ टक्के सुट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. 
वाढलेल्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या ३१ मार्च २०१६ व त्याआधीच्या कृषी व पाणीपुरवठा वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्वांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. 
याअंतर्गत योजना लागू झाल्यापासून एका महिन्याच्या आत जे ग्राहक योजनेचा फायदा घेवून देयक अदा करतील, त्यांना मूळ थकबाकीच्या केवळ ९५ टक्केच रक्कम अदा करावी लागणार आहे. थकबाकीवर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड यामध्ये १०० टक्के सुट; तर मुळ थकबाकीमध्ये  ५ टक्के सुट दिली जाणार आहे. 
१ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये योजनेत सहभाग घेणाºया ग्राहकांना १०० टक्के दंड व व्याजापासून मुक्ती मिळणार आहे. १ फेब्रुवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत योजनेत भाग घेणाºया ग्राहकांना व्याजातून ७५ टक्के सुट मिळणार असून मूळ थकबाकी आणि योजनेत सहभागी होईपर्यंतच्या तारखेपर्यंत लागणारे २५ टक्के व्याज भरावे लागणार आहे. अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार ग्राहकांनी देयक अदा करून पुर्ववत वीजपुरवठा सुरू करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.  
" वाशिम जिल्ह्यात महावितरणचे एकंदरित २ लाख १९ हजार ५६६ ग्राहक आहेत. त्यात घरकुती ग्राहकांची संख्या १ लाख ५२ हजार ८८६ आहे. आॅगस्ट-सप्टेंबर महिण्यापर्यंत या ग्राहकांपैकी थकबाकीदार ग्राहकांकडे १९.४५ कोटी रुपये थकबाकी होती. त्यांनी अभय योजनेचा लाभ घेवून थकबाकीमधून मुक्ती मिळवायला हवी," असे महावितरण, वाशिमचे उपअभियंता अतुल देवकर यांनी सांगितले.