शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना पुढील दोन वर्षे मिळणार नाही स्मार्ट ग्राम पुरस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 14:46 IST

वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.

ठळक मुद्देराज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते.स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे परत पारितोषिक देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत.

वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते. तसेच तालुकास्तरावरून स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून तपासणी करून स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतो. स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हा स्तरावर निवड झालेल्या गावाचे नाव तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनात आले आहे. तसेच तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केलेल्या ग्राम पंचायतीला त्याच विकास कामांच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठीदेखील विचार करण्यात येते. त्यामुळे अन्य गावांना या पुरस्कारापासून वंचित राहण्याची वेळ येते. शासनाच्या विविध पुरस्कार योजनेंतर्गत देखील गावांनी पुन्हा तीच विकास कामे दर्शवून पुन्हा -पुन्हा पारितोषिक प्राप्त करीत असल्याने इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे परत पारितोषिक देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या कोणत्याही पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिलेल्या आहेत. ग्रामविकास विभागाचे आदेश वाशिम जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, शासनाच्या निर्देशानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरूवारी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना