शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना पुढील दोन वर्षे मिळणार नाही स्मार्ट ग्राम पुरस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 14:46 IST

वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.

ठळक मुद्देराज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते.स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे परत पारितोषिक देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत.

वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते. तसेच तालुकास्तरावरून स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून तपासणी करून स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतो. स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हा स्तरावर निवड झालेल्या गावाचे नाव तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनात आले आहे. तसेच तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केलेल्या ग्राम पंचायतीला त्याच विकास कामांच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठीदेखील विचार करण्यात येते. त्यामुळे अन्य गावांना या पुरस्कारापासून वंचित राहण्याची वेळ येते. शासनाच्या विविध पुरस्कार योजनेंतर्गत देखील गावांनी पुन्हा तीच विकास कामे दर्शवून पुन्हा -पुन्हा पारितोषिक प्राप्त करीत असल्याने इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे परत पारितोषिक देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या कोणत्याही पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिलेल्या आहेत. ग्रामविकास विभागाचे आदेश वाशिम जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, शासनाच्या निर्देशानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरूवारी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना