शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना पुढील दोन वर्षे मिळणार नाही स्मार्ट ग्राम पुरस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 14:46 IST

वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.

ठळक मुद्देराज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते.स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे परत पारितोषिक देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत.

वाशिम - स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावे तसेच तालुका आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना दिले आहेत.राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिने २१ नोव्हेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत तालुकास्तरावरून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येते. तसेच तालुकास्तरावरून स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून तपासणी करून स्मार्ट ग्राम पुरस्कार देण्यात येतो. स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत निकषानुसार जिल्हा स्तरावर निवड झालेल्या गावाचे नाव तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनात आले आहे. तसेच तालुका स्तरावर स्मार्ट ग्राम म्हणून घोषित केलेल्या ग्राम पंचायतीला त्याच विकास कामांच्या आधारे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठीदेखील विचार करण्यात येते. त्यामुळे अन्य गावांना या पुरस्कारापासून वंचित राहण्याची वेळ येते. शासनाच्या विविध पुरस्कार योजनेंतर्गत देखील गावांनी पुन्हा तीच विकास कामे दर्शवून पुन्हा -पुन्हा पारितोषिक प्राप्त करीत असल्याने इतर गावांना पुरस्काराची संधी मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत तसेच तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींना त्याच विकास कामाच्या आधारे परत पारितोषिक देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गावांना त्याच विकास कामांच्या आधारे पुढील दोन वर्षाच्या कालावधीसाठी ‘स्मार्ट ग्राम’ योजनेंतर्गतच्या कोणत्याही पुरस्कारासाठी परत ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिलेल्या आहेत. ग्रामविकास विभागाचे आदेश वाशिम जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, शासनाच्या निर्देशानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना गुरूवारी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना