शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘काैशल्य’च्या सहायक आयुक्ताकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, गुन्हा दाखल

By सुनील काकडे | Updated: October 27, 2023 17:48 IST

न्यायालयात ‘चार्जशिट’ दाखल होणार

सुनील काकडे, वाशिम: येथील जिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याने त्याच्याच कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीतेने वाशिम पोलिसांत १४ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली. त्यात विविध स्वरूपातील गंभीर आरोप करण्यात आले असून संबंधित सहायक आयुक्तावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, २६ ऑक्टोबरला शहर पोलिसांनी आरोपीचे बयान घेतले आहे. साक्षी तपासल्यानंतर न्यायालयात चार्जशिट दाखल केली जाईल, अशी माहिती ठाणेदार गजानन धंदर यांनी २७ ऑक्टोबर रोजी दिली.

यासंदर्भातील तक्रारीत पिडीत महिला अधिकाऱ्याने नमूद केले आहे की, त्या २०१४ मध्ये शासकीय सेवेत रुजू झाल्या. २०२१ पासून वाशिमच्या कार्यालयात त्यांनी कामकाज सुरू केले. यादरम्यान जुलै २०२३ मध्ये सहायक आयुक्त म्हणून प्रफुल्ल शेळके हा रुजू झाला. तेव्हापासूनच तो माझ्यावर पाळत ठेवून आहे. काहीच काम नसतानाही वारंवार स्वत:च्या केबीनमध्ये बोलावणे, टक लावून पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करणे आणि द्विअर्थाने संभाषण करणे त्याने सातत्याने सुरू ठेवले. आपण त्याकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले; पण त्याच्या वागणूकीत कुठलाच फरक पडला नाही. याऊलट मी प्रतिसाद न दिल्याने लहानसहान कारणांवरून नोटीस देऊन त्रास देणे सुरू केले. वरिष्ठांसोबत माझ्याबाबत व्हाटस्ॲपवर खालच्या भाषेत ‘चाटींग’ केली. अशाप्रकारे माझा शारिरीक व मानसिक छळ करणे त्याने अवलंबिले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिल्हा काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याच्यावर भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ३५४ ‘ड’ नुसार गुन्हा दाखल केला.

‘सीसी’द्वारे पिडीतेवर ठेवायचा नजर

सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके याने आपण काम करित असलेल्या ऑफीसमध्ये हेतुपुरस्सर ‘सीसी कॅमेरा’ लावला. त्याचा ‘ॲक्सेस’ त्याने स्वत:च्या केबीनमध्ये ठेवला. याद्वारे तो सतत माझ्यावर नजर ठेवत होता, असा गंभीर आरोप पिडीत महिला अधिकाऱ्याने तक्रारीत केला आहे.

गुन्हा सिद्ध झाल्यास जावे लागणार कारागृहात

या प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल शेळके याने २६ ऑक्टोबर रोजी वाशिम शहर पोलिस स्टेशन गाठून बयान नोंदविले आहे. कार्यालयीन अन्य कर्मचाऱ्यांची साक्ष नोंदविल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले जाणार आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ ते ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते, अशी माहिती वाशिमचे ठाणेदार गजानन धंदर यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी