शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाशिम जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:44 IST

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी स्थानिक वाटाने लॉन येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस पडला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या.शिबिराच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, धनंजय गोगटे, अनुप खांडे यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करणे, वाहिवाटीचा रस्ता, सिंचन विहिरी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, पाणीपुरवठा योजना, वीज जोडणी, घरकुल, औषधी साठा उपलब्ध नसणे आदी विषयांच्या तक्रारींचा समावेश होता. न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळता उर्वरित तक्रारींवर यावेळी सुनावणी घेण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी घेणे आवश्यक आहे, अशी प्रकरणांची सुनावणी विहित कालमर्यादेत पूर्ण करून प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.पांदन रस्ते, तसेच वाहिवाटीच्या रस्त्यांबाबतची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तहसीलदार, तालुका भूमिअभिलेख कार्यालय व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही ना. राठोड यांनी दिले. मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये २०१८ मध्ये वादळी वाऱ्याने घरांचे नुकसान झाले. तेथील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसल्याची तक्रार शिबिरात दाखल झाली होती. ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध ठेवण्याच्या सूचना ना. राठोड यांनी प्रशासनाला केल्या. 

अशा आहेत तालुकानिहाय तक्रारीसमाधान शिबिरासाठी वाशिम तालुक्यातून १२६, मालेगाव तालुक्यातून ५३, रिसोड तालुक्यातून ७१, मंगरुळपीर तालुक्यातून १३६, कारंजा तालुक्यातून ४३० व मानोरा तालुक्यातून १३८ अशा एकूण ९५४ तक्रारी दाखल झाल्या. शेतीसाठी रस्ता मागणीसाठी दाखल प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून निर्णय द्यावा व ही प्रकरणे निकाली काढावीत, अशा सूचना पालकमंत्री ना. राठोड यांनी केल्या. या शिबिरात रात्री उशिरापर्यंत तक्रारी दाखल करणे सुरूच होते.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय