शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

वाशिम जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतील ९ प्रकल्पांची कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:16 IST

वाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली.

ठळक मुद्दे ६ जिल्ह्यांमधील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. विविध स्वरूपातील कारणांमुळे रखडलेल्या वाशिम जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्पांचा समावेश.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून वाडी रायताळ, वारा जहाँंगीर आणि पांगराबंदी या प्रकल्पांची किरकोळ कामे बाकी आहेत. दरम्यान, पावसाळ्याचे पाणी या प्रकल्पांमध्ये साठविण्यात आल्याने हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून आगामी रब्बी हंगामात त्याचा फायदा शेतकºयांना होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी बुधवारी दिली.शासनाने विदर्भातील दुष्काळप्रवण व आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यांमधील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याअंतर्गत विविध स्वरूपातील कारणांमुळे रखडलेल्या वाशिम जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्पांचा समावेश असून त्यासाठी २४८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान, ही कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुषंगाने ९ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अरक, उमरी, पारवा कोहर, गायवळ आणि स्वासीन हे पाच प्रकल्प जून २०१९ पर्यंत; तर उर्वरित ४ प्रकल्पांची कामे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केल्याची माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती