शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वाशिम जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतील ९ प्रकल्पांची कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:16 IST

वाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली.

ठळक मुद्दे ६ जिल्ह्यांमधील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. विविध स्वरूपातील कारणांमुळे रखडलेल्या वाशिम जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्पांचा समावेश.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून वाडी रायताळ, वारा जहाँंगीर आणि पांगराबंदी या प्रकल्पांची किरकोळ कामे बाकी आहेत. दरम्यान, पावसाळ्याचे पाणी या प्रकल्पांमध्ये साठविण्यात आल्याने हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून आगामी रब्बी हंगामात त्याचा फायदा शेतकºयांना होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी बुधवारी दिली.शासनाने विदर्भातील दुष्काळप्रवण व आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यांमधील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याअंतर्गत विविध स्वरूपातील कारणांमुळे रखडलेल्या वाशिम जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्पांचा समावेश असून त्यासाठी २४८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान, ही कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुषंगाने ९ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अरक, उमरी, पारवा कोहर, गायवळ आणि स्वासीन हे पाच प्रकल्प जून २०१९ पर्यंत; तर उर्वरित ४ प्रकल्पांची कामे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केल्याची माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती