शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

वाशिम जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:34 IST

वाशिम : गावपातळीवरील विकासकामांचे ज्याठिकाणी नियोजन केले जाते, त्या जिल्ह्यातील ४९३ पैकी तब्बल ९७ ग्रामपंचायत कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहे. गं

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गावपातळीवरील विकासकामांचे ज्याठिकाणी नियोजन केले जाते, त्या जिल्ह्यातील ४९३ पैकी तब्बल ९७ ग्रामपंचायत कार्यालयांचा कारभार भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे या इमारतींमध्ये कुठल्याही स्वरूपातील सुविधा नसल्याने कामकाज वारंवार प्रभावित होत असून कर्मचारी पुरते त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची कार्यालयांची स्थिती अत्यंत चिंताजनक असून एकाच ग्रामसेवकाकडे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार असणे, सरपंच-उपसरपंचांसह सदस्य कार्यालयात नियमित न येणे, अन्य कर्मचारीही गैरहजर असणे आदी कारणांमुळे गावपातळीवरील विकासकामांना खीळ बसत आहे. त्यातच ९७ ग्रामपंचायतींना स्वत:च्या हक्काची इमारतच नसून भाड्याच्या इमारतीत अथवा गावात कुठेतरी पर्यायी व्यवस्था करून थातूरमातूर स्वरूपात कार्यालये चालविली जात आहेत. त्यात प्रामुख्याने विजेची पुरेशी सुविधा नसणे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, संगणकांना पुरेशा ताकदीने इंटरनेट स्पीड नसणे, आदी कारणांमुळे ही कार्यालये नसल्यातच जमा आहेत. परिणामी, जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या लोकांचे अनेक मुलभूत प्रश्न निकाली निघणे अवघड झाले आहे. अनेकांना तर आपल्या समस्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये नेमक्या कुणाकडे मांडायच्या, याचाही पत्ता अद्यापपर्यंत लागलेला नाही. एकूणच उद्भवलेल्या या सर्व गंभीर स्थितीमुळे विकासकामांचा पुरता बट्याबोळ झाला आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष पुरवून ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयासाठी इमारती उपलब्ध करून देण्यासह ग्रामपंचायतींच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत