शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सीबीएसई बारावीचे ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीप्रमाणेच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, १ जून रोजी ...

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीप्रमाणेच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, १ जून रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील दोन शाळांमधील ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. दरम्यान, पुढील प्रवेश नेमक्या कोणत्या आधारावर होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सीबीएसई बोर्डाने यापूर्वी इयत्ता दहावीची परीक्षादेखील रद्द केली. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली. दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका अजून कायम आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसई बारावीची परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीला घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असेल, असे सांगून या कठीण प्रसंगात त्यांना परीक्षेचा ताण देणे उचित ठरणार नाही. बारावीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्याआधारे जाहीर केला जाईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. या निर्णयानुसार जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि भावना पब्लिक स्कूल या दोन शाळेतील ७१ विद्यार्थी हे परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत.

०००

जिल्ह्यातील सीबीएसई बारावीच्या एकूण शाळा- २

एकूण विद्यार्थी- ७१

०००००

बॉक्स

पुढील प्रवेशाचे काय होणार?

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ असणाऱ्या सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. बारावीनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य शाखेचे प्रवेश नेमक्या कोणत्या आधारे केले जातील, सीईटी परीक्षेचे स्वरूप कसे राहील, हे अद्याप निश्चित नाही. पुढील प्रवेश प्रक्रियेचे काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

०००००

कोट बॉक्स

सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. पुढील प्रवेशासाठी सीईटी घेतली जाईल. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सीईटी घ्यावयाची, याचा निर्णय कोरोना परिस्थिती पाहून वरिष्ठ स्तरावर होऊ शकतो, असा अंदाज आहे.

- आर. जे. चंदनशीव,

शिक्षण तज्ज्ञ तथा प्राचार्य, नवोदय विद्यालय, वाशिम.

०००