शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्नावरून तीन गावातील ७०० लोकांचा मोतसावंगा धरणाला वेढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:36 IST

गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे.

मंगरूळपीर (वाशिम) : गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे. पाणीप्रश्नावरून पेटलेल्या या आंदोलनामुळे जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासन चांगलेच हैराण झाले असून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासाठी मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या गावातील शेतक-यांनी जमिनी संपादित करून दिल्या. मात्र, धरणातील पाण्याचा संबंधित गावातील शेतक-यांना फायदा होण्याऐवजी अन्य गावांचेच चांगभले होत आहे. निंबी या गावाला कालव्याव्दारे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. मात्र, त्यास प्रखर विरोध दर्शवून तिन्ही गावातील महिला-पुरूषांनी आपल्या गुराढोरांसह धरणावरच ठिय्या मांडला आहे.

हा निर्णय तत्काळ मागे घ्या; अन्यथा धरणातच सामूहिकरित्या जलसमाधी घेवू, असा निर्वाणीचा इशारा गावक-यांनी दिला आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा पराजे, मंगरूळपीरचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्यासह अन्य अधिकारीवर्गाकडून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तो वृत्त लिहिस्तोवर यशस्वी झालेला नव्हता.