शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पाणीप्रश्नावरून तीन गावातील ७०० लोकांचा मोतसावंगा धरणाला वेढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:36 IST

गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे.

मंगरूळपीर (वाशिम) : गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे. पाणीप्रश्नावरून पेटलेल्या या आंदोलनामुळे जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासन चांगलेच हैराण झाले असून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासाठी मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या गावातील शेतक-यांनी जमिनी संपादित करून दिल्या. मात्र, धरणातील पाण्याचा संबंधित गावातील शेतक-यांना फायदा होण्याऐवजी अन्य गावांचेच चांगभले होत आहे. निंबी या गावाला कालव्याव्दारे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. मात्र, त्यास प्रखर विरोध दर्शवून तिन्ही गावातील महिला-पुरूषांनी आपल्या गुराढोरांसह धरणावरच ठिय्या मांडला आहे.

हा निर्णय तत्काळ मागे घ्या; अन्यथा धरणातच सामूहिकरित्या जलसमाधी घेवू, असा निर्वाणीचा इशारा गावक-यांनी दिला आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा पराजे, मंगरूळपीरचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्यासह अन्य अधिकारीवर्गाकडून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तो वृत्त लिहिस्तोवर यशस्वी झालेला नव्हता.