शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

पाणीप्रश्नावरून तीन गावातील ७०० लोकांचा मोतसावंगा धरणाला वेढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:36 IST

गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे.

मंगरूळपीर (वाशिम) : गावातील धरणाचे पाणी अन्यत्र वळविल्यास जलसमाधी घेवू, या निर्णयावर ठाम असलेल्या मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या तीन गावांमधील सुमारे ७०० शेतक-यांनी रविवारी रात्री १० वाजतापासून मोतसावंगा धरणाला वेढा घातला आहे. पाणीप्रश्नावरून पेटलेल्या या आंदोलनामुळे जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासन चांगलेच हैराण झाले असून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मंगरूळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणासाठी मोतसावंगा, रामगाव आणि दुधखेडा या गावातील शेतक-यांनी जमिनी संपादित करून दिल्या. मात्र, धरणातील पाण्याचा संबंधित गावातील शेतक-यांना फायदा होण्याऐवजी अन्य गावांचेच चांगभले होत आहे. निंबी या गावाला कालव्याव्दारे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. मात्र, त्यास प्रखर विरोध दर्शवून तिन्ही गावातील महिला-पुरूषांनी आपल्या गुराढोरांसह धरणावरच ठिय्या मांडला आहे.

हा निर्णय तत्काळ मागे घ्या; अन्यथा धरणातच सामूहिकरित्या जलसमाधी घेवू, असा निर्वाणीचा इशारा गावक-यांनी दिला आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, उपविभागीय पोलिस अधिकारी नंदा पराजे, मंगरूळपीरचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्यासह अन्य अधिकारीवर्गाकडून गावक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तो वृत्त लिहिस्तोवर यशस्वी झालेला नव्हता.