शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:42 IST

शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.

ठळक मुद्दे३ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : मागासलेल्या व अविकसित तांड्यावस्तीचा विकास व्हावा, तेथे मूलभूत सुविधा  प्राप्त होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.स्थानिक विश्राम भवनावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले,  की भाजपाचे  जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या  प्रयत्नामुळे व शासन दरबारी  सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  वाशिम जिल्ह्यात ३१ तांडा  व ३१ वस्ती असे मिळून ६२ कामे मंजूर झाली. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून ३  कोटी १५ लाख रुपये निधीची  तरतूद झाली. डी.पी.डी.सी.मार्फत अडीच कोटी रुपये  मंजूर झाली, तसेच शासनातर्फेसुद्धा ३0 टक्के कपात झाली. शासनातर्फेसुद्धा अडीच  कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातील ३0 टक्के  कर्जमाफीसाठी कपात करण्यात आले.  पाच कोटी रुपायांतील ६0 टक्के रक्कम कपात झाली. उर्वरित ३ कोटी १५ लाखांचा  निधी या कामासाठी मंजूर आहे. सदर कामाचे  इस्टिमेट तयार करून संबंधित  गावाच्या  ग्रामपंचायतीने कामे त्वरित सुरू करावी, असेही ते म्हणाले. ही कामे ज्या तांड्यात, वस्तीत  करावयाची आहे, तेथे नामफलक लावावा, जेथे नामफलक दिसणार नाही, तेथील अंतिम  देयक मिळणार नाही, अशा सूचना आपण केल्या आहेत. ज्या तांड्यात, वस्तीत गरज  आहे, तेथेच ही कामे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात टाकण्यात आली आहेत.  तांड्या-वस्तीत एखादा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा नसते म्हणून प्राधान्यक्रम हा  सभागृह बांधण्यावर दिला आहे. त्यासाठी गावाच्या ग्रामसेवकांनी तसे प्रस्ताव सादर केले  पाहिजे. सदरहू कामे दज्रेदार व्हावीत, असा आग्रह आमचा आहे, असेही सुनील महाराज  यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात एवढय़ा मोठय़ा  प्रमाणात विकास कामे झाल्यानंतर  तांड्याचा,  वसतीचा चेहरामोहरा बदलणार आहे. पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, संगायोचे  अध्यक्ष  नीळकंठ पाटील, डॉ.अविनाश  लोथे, वाईगौळचे उपसरपंच जयसिंग राठोड, शेखर  जाधव आदी उपस्थित होते.