शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:42 IST

शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.

ठळक मुद्दे३ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : मागासलेल्या व अविकसित तांड्यावस्तीचा विकास व्हावा, तेथे मूलभूत सुविधा  प्राप्त होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.स्थानिक विश्राम भवनावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले,  की भाजपाचे  जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या  प्रयत्नामुळे व शासन दरबारी  सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  वाशिम जिल्ह्यात ३१ तांडा  व ३१ वस्ती असे मिळून ६२ कामे मंजूर झाली. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून ३  कोटी १५ लाख रुपये निधीची  तरतूद झाली. डी.पी.डी.सी.मार्फत अडीच कोटी रुपये  मंजूर झाली, तसेच शासनातर्फेसुद्धा ३0 टक्के कपात झाली. शासनातर्फेसुद्धा अडीच  कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातील ३0 टक्के  कर्जमाफीसाठी कपात करण्यात आले.  पाच कोटी रुपायांतील ६0 टक्के रक्कम कपात झाली. उर्वरित ३ कोटी १५ लाखांचा  निधी या कामासाठी मंजूर आहे. सदर कामाचे  इस्टिमेट तयार करून संबंधित  गावाच्या  ग्रामपंचायतीने कामे त्वरित सुरू करावी, असेही ते म्हणाले. ही कामे ज्या तांड्यात, वस्तीत  करावयाची आहे, तेथे नामफलक लावावा, जेथे नामफलक दिसणार नाही, तेथील अंतिम  देयक मिळणार नाही, अशा सूचना आपण केल्या आहेत. ज्या तांड्यात, वस्तीत गरज  आहे, तेथेच ही कामे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात टाकण्यात आली आहेत.  तांड्या-वस्तीत एखादा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा नसते म्हणून प्राधान्यक्रम हा  सभागृह बांधण्यावर दिला आहे. त्यासाठी गावाच्या ग्रामसेवकांनी तसे प्रस्ताव सादर केले  पाहिजे. सदरहू कामे दज्रेदार व्हावीत, असा आग्रह आमचा आहे, असेही सुनील महाराज  यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात एवढय़ा मोठय़ा  प्रमाणात विकास कामे झाल्यानंतर  तांड्याचा,  वसतीचा चेहरामोहरा बदलणार आहे. पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, संगायोचे  अध्यक्ष  नीळकंठ पाटील, डॉ.अविनाश  लोथे, वाईगौळचे उपसरपंच जयसिंग राठोड, शेखर  जाधव आदी उपस्थित होते.