शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:42 IST

शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.

ठळक मुद्दे३ कोटी १५ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : मागासलेल्या व अविकसित तांड्यावस्तीचा विकास व्हावा, तेथे मूलभूत सुविधा  प्राप्त होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना  कार्यान्वित केली.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजूर करण्यात आली  असून, त्यासाठी ३ कोटी १५ लाख रु पयांच्या  निधीची  तरतूद करण्यात आली, अशी  माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार  परिषदेत दिली.स्थानिक विश्राम भवनावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ते म्हणाले,  की भाजपाचे  जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या  प्रयत्नामुळे व शासन दरबारी  सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  वाशिम जिल्ह्यात ३१ तांडा  व ३१ वस्ती असे मिळून ६२ कामे मंजूर झाली. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून ३  कोटी १५ लाख रुपये निधीची  तरतूद झाली. डी.पी.डी.सी.मार्फत अडीच कोटी रुपये  मंजूर झाली, तसेच शासनातर्फेसुद्धा ३0 टक्के कपात झाली. शासनातर्फेसुद्धा अडीच  कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातील ३0 टक्के  कर्जमाफीसाठी कपात करण्यात आले.  पाच कोटी रुपायांतील ६0 टक्के रक्कम कपात झाली. उर्वरित ३ कोटी १५ लाखांचा  निधी या कामासाठी मंजूर आहे. सदर कामाचे  इस्टिमेट तयार करून संबंधित  गावाच्या  ग्रामपंचायतीने कामे त्वरित सुरू करावी, असेही ते म्हणाले. ही कामे ज्या तांड्यात, वस्तीत  करावयाची आहे, तेथे नामफलक लावावा, जेथे नामफलक दिसणार नाही, तेथील अंतिम  देयक मिळणार नाही, अशा सूचना आपण केल्या आहेत. ज्या तांड्यात, वस्तीत गरज  आहे, तेथेच ही कामे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात टाकण्यात आली आहेत.  तांड्या-वस्तीत एखादा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा नसते म्हणून प्राधान्यक्रम हा  सभागृह बांधण्यावर दिला आहे. त्यासाठी गावाच्या ग्रामसेवकांनी तसे प्रस्ताव सादर केले  पाहिजे. सदरहू कामे दज्रेदार व्हावीत, असा आग्रह आमचा आहे, असेही सुनील महाराज  यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात एवढय़ा मोठय़ा  प्रमाणात विकास कामे झाल्यानंतर  तांड्याचा,  वसतीचा चेहरामोहरा बदलणार आहे. पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुका अध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण, संगायोचे  अध्यक्ष  नीळकंठ पाटील, डॉ.अविनाश  लोथे, वाईगौळचे उपसरपंच जयसिंग राठोड, शेखर  जाधव आदी उपस्थित होते.