शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

वाशिम जिल्ह्यात तांडा वस्ती सुधार योजनेची ६२ कामे मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 14:16 IST

मानोरा  : मागासलेल्या व अविकसीत तांड्यावस्तीचा विकास व्हावा तेथे मुलभुत सुविधा प्राप्त होवुन नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना कार्यान्वीत केले.  

ठळक मुद्दे३ कोटी १५ लक्ष रुपयाची तरतुद३१ तांडा व ३१ वस्ती असे मिळुन ६२ कामे मंजुर झाली.

 

मानोरा  : मागासलेल्या व अविकसीत तांड्यावस्तीचा विकास व्हावा तेथे मुलभुत सुविधा प्राप्त होवुन नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने तांडा वस्ती सुधार योजना कार्यान्वीत केले.  वाशिम जिल्ह्यात या योजनेमार्फत ६२ कामे मंजुर करण्यात आली असुन त्यासाठी ३ कोटी १५ लक्ष रु पयाच्या  निधीची  तरतुद करण्यात आली अशी माहिती या समितीचे जिल्हाध्यक्ष सुनिल महाराज राठोड यांनी रविवारी १९ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक विश्राम भवनावर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ते म्हणाले की, भाजपाचे  जिल्हाध्यक्ष तथा कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नामुळे व शासन दरबारी  सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे  वाशिम जिल्ह्यात ३१ तांडा व ३१ वस्ती असे मिळुन ६२ कामे मंजुर झाली. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून ३ कोटी १५ लक्ष रुपये निधीची  तरतुद झाली. डी.पी.डी.सी. मार्फत अडीच कोटी रुपये मंजुर झाली तसेच शासनातर्फे सुध्दा ३० टक्के कपात झाली तसेच शासनातर्फे सुध्दा अडीच कोटी रुपये मंजुर झाले होते. त्यातील ३० टक्के  कर्जमाफीसाठी कपात करण्यात आले. पाच कोटी रुपायतील ६० टक्के रक्कम कपात झाली, उर्वरीत ३ कोटी १५ लाखाचा निधी या कामासाठी मंजुर आहे. सदर कामाचे  इस्टमेट तयार करुन संबंधीत  गावाच्या ग्रामपंचायतीने कामे त्वरित सुरु करावी असेही ते म्हणाले. ही कामे ज्या तांड्यात वस्तीत करयाची आहे तेथे नामफलक लावावा , जेथे नामफलक दिसणार नाही तेथील अंतीम देयक मिळणार नाही. अशा सुचना आपण केल्या आहेत. ज्या तांउ्यात वस्तीत गरज आहे तेथेच ही कामे आमदार राजेंद्र पाटणी यांचे मार्गदर्शनात टाकण्यात आली आहेत. तांड्यावस्तीत एखाद्या सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी जागा नसते म्हणुन प्राधान्यक्रम हा सभागृह बांधण्यावर दिला आहे.त्यासाठी गावाच्या ग्रामसेवकांनी तसे प्रस्ताव सादर केले पाहिजे. सदरहु कामे दर्जेदार व्हावीत असा आग्रह आमचा आहे असेही सुनिल महाराज यांनी सांगितले. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्यानंतर  तांड्याचा  वसतीचा चेहरामोहरा बदलणार आहे.  पत्रकार परिषदेला भाजपाचे तालुकाअध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, संगायोचे  अध्यक्ष निळकंठ पाटील, डॉ.अविनाश  लोथे, वाईगौळचे उपसरपंच जयसिंग राठोड, शेखर जाधव आदि उपस्थित होते.