शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:05 IST

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला.

ठळक मुद्दे१२० गावांतील कामे ४ हजार टीसीएम जलसाठा

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. या जलसाठ्यातून सुमारे ८ हजार १०० हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असा आशावादही प्रशासनाने व्यक्त केला. 

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलस्त्रोतातील गाळ काढणे, पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील जलपातळीत वाढ करणे यासह जलसंधारणाची विविध कामे केली जातात.  या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात सदर अभियान सुरू झाल्यापासून ते ७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत एकूण ७ हजार ६७६ कामे पूर्ण झाली आहेत. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांत ५ हजार ५८ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ३५ हजार ३२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली. २०० गावांमध्ये  वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मंगरूळपीर २७, मानोरा ६१ व कारंजा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश होता. सन २०१६-१७ मध्ये जिह्यातील १४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. वाशिम तालुक्यातील २४, रिसोड १७, मालेगाव २४, मंगरूळपीर ३१, मानोरा २१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा यामध्ये  समावेश आहे. या गावांमध्ये २ हजार १२ कामे पूर्ण झाली असून १६ हजार २० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. सन २०१७-१८ वर्षात जलयुक्त शिवार अभियानात १२० गावे असून, ७ नोव्हेंबरपर्यंत ६०६ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे विहित मुदतीच्या आत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी