शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:05 IST

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला.

ठळक मुद्दे१२० गावांतील कामे ४ हजार टीसीएम जलसाठा

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १२० गावांत आतापर्यंत जलसंधारणाची ६०६ कामे पूर्ण झाली असून, त्याद्वारे ४ हजार ५० टीसीएम जलसाठा तयार झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. या जलसाठ्यातून सुमारे ८ हजार १०० हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होईल, असा आशावादही प्रशासनाने व्यक्त केला. 

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलस्त्रोतातील गाळ काढणे, पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील जलपातळीत वाढ करणे यासह जलसंधारणाची विविध कामे केली जातात.  या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात सदर अभियान सुरू झाल्यापासून ते ७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत एकूण ७ हजार ६७६ कामे पूर्ण झाली आहेत. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांत ५ हजार ५८ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ३५ हजार ३२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली. २०० गावांमध्ये  वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मंगरूळपीर २७, मानोरा ६१ व कारंजा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश होता. सन २०१६-१७ मध्ये जिह्यातील १४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. वाशिम तालुक्यातील २४, रिसोड १७, मालेगाव २४, मंगरूळपीर ३१, मानोरा २१ व कारंजा तालुक्यातील ३२ गावांचा यामध्ये  समावेश आहे. या गावांमध्ये २ हजार १२ कामे पूर्ण झाली असून १६ हजार २० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. त्यामुळे सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला. सन २०१७-१८ वर्षात जलयुक्त शिवार अभियानात १२० गावे असून, ७ नोव्हेंबरपर्यंत ६०६ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे विहित मुदतीच्या आत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारWaterपाणी