शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

६ टक्के रुग्ण १६ वर्षांखालील; पण लस नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:43 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंध म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडच्या काळात बालकांनादेखील ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गापासून प्रतिबंध म्हणून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अलीकडच्या काळात बालकांनादेखील कोरोना संसर्ग होत आहे. जिल्ह्यात १६ वर्षांआतील जवळपास १३०० बालकांना संसर्ग झाला आहे. परंतु, बालकांसाठी अद्याप लस नसल्याने देता येत नाही.

देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मध्यंतरी कोरोनाचा आलेख खाली आला होता. आता पुन्हा कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत कोरोना संसर्गाचा अक्षरश: ‘स्फोट’ झाला. एप्रिल महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले तर दुसरीकडे १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेसही सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात आहे. १६ वर्षांआतील बालकांनादेखील कोरोना संसर्ग होत आहे. परंतु, १८ वर्षांखालील बालकांसाठी अद्याप लस निघाली नाही. त्यामुळे देता येत नाही. ५२ टक्के रुग्ण हे ४५ वर्षांआतील आहेत. परंतु, वयाचे बंधन असल्याने या रुग्णांनादेखील लस देता येत नाही.

००००

४५ पेक्षा कमी वयाचे १२ हजार रुग्ण; पण लसीकरण सुरू नाही

जिल्ह्यात सध्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ हजारांच्या घरात आहे. पहिल्या लाटेत शक्यतोवर ५० वर्षांवरील नागरिकांना कोरोना संसर्ग होत होता. दुसऱ्या लाटेत वयाचे बंधन नसून कुणालाही संसर्ग होत आहे. जिल्ह्यात जवळपास १२ हजार रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांना नियमानुसार लसीकरण सुरू आहे. त्यामुळे ४५ वर्षांआतील नागरिकांना लसीकरण करता येत नाही.

००००

मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत...

कोरोना प्रतिबंधक लस ही १८ वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. अद्याप १८ वर्षांखालील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली नाही. जोपर्यंत मुलांसाठी लस येत नाही, तोपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविणे, मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये. दुसऱ्या लाटेत १६ वर्षांआतील मुलांनादेखील संसर्ग होत असल्याने मुलांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी पालकांनी घेणे गरजेचे आहे.

०००००

१६ वर्षांखालील १३५० रुग्ण; पण लसच उपलब्ध नाही

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे. १ ते ५ वर्षे वयोगटातील जवळपास २५० बालकांना कोरोना संसर्ग झाला आहे तर ५ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास ११०० बालके कोरोना पॉझिटिव्ह आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी १६ वर्षांखालील मुलांचे प्रमाण ६ टक्के येते. मुलांसाठी लस उपलब्ध नाही. लस येईपर्यंत मुलांना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यावा लागणार आहे.