शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

ग्राम पंचायतींचा ५६ टक्के निधी अखर्चित !

By admin | Updated: March 23, 2017 02:24 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; ४४ कोटींचा निधी वितरित, १९.३६ कोटींचा खर्च.

संतोष वानखडे वाशिम, दि. २२- जिल्हयातील ४९१ ग्राम पंचायतींना २0१५-१६ व २0१६-१७ या कालावधीत १४ व्या वित्त आयोगातून ४४ कोटी रुपयांचा निधी मिळालेला असतानाही, जानेवारी २0१७ पर्यंंत केवळ १९.३६ कोटींचा खर्च करण्यात आला. २४.६४ कोटी रुपये अखर्चित असून, ही टक्केवारी ५६ च्या घरात जाते. १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी सन २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षे ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींना एकूण ४४ कोटी सात हजार रुपयांचा निधी वितरित केल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने जमा-खर्चाचा आढावा घेतला असता तब्बल २४ कोटी ६४ लाख ३ हजार ३६१ रुपये अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले.एकिकडे अनेक गावांत मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत तर दुसरीकडे १४ व्या वित्त आयोगांतर्गतचा निधीही त्या-त्या गावात मोठय़ा प्रमाणात अखर्चित राहत असल्याने, ग्रामपंचायतींकडून गावकर्‍यांची दिशाभूल होण्याची भीती वर्तविली जात आहे.स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी दरवर्षाला भरघोष निधी मिळणार असल्याने गावात मुलभूत सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या गावकर्‍यांच्या पदरी यामुळे निराशा पडली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा निधी अखर्चित राहत असतानाही, शासनाकडून निधीच मिळत नसल्याचे ह्यरडगाणेह्ण ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी व सचिवांकडून गायिले जाते. पदाधिकारी व ग्रामसचिवांच्या ह्यरडगाण्याह्णचे पितळ अखर्चित निधीच्या आकडेवारीने उघडे पाडले आहे. प्राप्त व अखर्चित निधीचा लेखाजोखा तालुकाप्राप्त निधी(लाख)           अखर्चित निधी (लाख)वाशिम             ८१.३५                      १0.१४मालेगाव           ७७.५७                      ६२.८८रिसोड                ७८.२८                     ५८.४२कारंजा              ६७.५२                      ४१.२८मानोरा              ६७.९५                      ३३.३९मंगरूळपीर        ६७.२९                      ४0.२७