शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सीबीएसईचे ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ...

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रमावस्था निर्माण केली आहे. परीक्षा न घेता सीबीएसईच्या दहावीतील विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास झाले आहेत. या निर्णयाबाबत पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५५० विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत. कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. याचा फटका शिक्षण क्षेत्राला जबर बसला असून, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शेवटी सीबीएसईने परीक्षा न घेताच दहावीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले आहेत.

००००

पालक काय म्हणतात...

कोरोनामुळे परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले, ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही संभ्रम निर्माण करणारी आहे. तंत्रनिकेतन किंवा अन्य शाखेत कोणत्या आधार प्रवेश होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

- माणिक इंगळे, पालक,

०००

कोरोनामुळे ऑनलाइन वर्ग झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेता आल्या असता, परीक्षा न घेता पास करणे तेवढे उचित नाही. विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

- विनोद वानखडे,पालक

०००

दहावीच्या परीक्षा होणे गरजेचे होते. या परीक्षेतील गुणानुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतात. परीक्षाच नसल्याने गुणदान कसे होईल, हे अद्याप निश्चित नाही. यामध्ये स्पष्टता यायला हवी.

- दीपक देशमुख, पालक

००००

कोरोनामुळे सीबीएसईने दहावीची परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पास करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेक कसोट्यांवर खरा कसा उतरेल, याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे. परीक्षा नसल्याने गुणदान पद्धत ठरविताना अनेक अडचणी येऊ शकतात. मेरिट लिस्टनुसार पुढच्या वर्गात प्रवेश देताना संभ्रम राहील.

सतीश सांगळे, शिक्षक

००००

अकरावी प्रवेशाबाबत द्विधास्थिती

सीबीएसईने दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास केले. मेरिट लिस्टनुसार अकरावी, आयटीआयचे प्रवेश नेमके कसे होणार, हे स्पष्ट नाही. प्रवेश परीक्षा घेऊन कदाचित प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी, याबाबत स्पष्टता हवी.

००

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

पेपर सोडविल्यानुसार विद्यार्थ्यांना गुण मिळतात. दहावीतील गुणानुसार, त्याला कोणत्या शाखेला प्रवेश द्यावयाचा याचा निर्णय सुलभ होऊ शकतो. परीक्षा नसल्यामुळे गुणदान समपातळीवर आणण्यासाठी प्रवेश परीक्षा होऊ शकते.