शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

सीबीएसईचे ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ...

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रमावस्था निर्माण केली आहे. परीक्षा न घेता सीबीएसईच्या दहावीतील विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास झाले आहेत. या निर्णयाबाबत पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५५० विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत. कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. याचा फटका शिक्षण क्षेत्राला जबर बसला असून, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शेवटी सीबीएसईने परीक्षा न घेताच दहावीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले आहेत.

००००

पालक काय म्हणतात...

कोरोनामुळे परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले, ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही संभ्रम निर्माण करणारी आहे. तंत्रनिकेतन किंवा अन्य शाखेत कोणत्या आधार प्रवेश होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

- माणिक इंगळे, पालक,

०००

कोरोनामुळे ऑनलाइन वर्ग झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेता आल्या असता, परीक्षा न घेता पास करणे तेवढे उचित नाही. विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

- विनोद वानखडे,पालक

०००

दहावीच्या परीक्षा होणे गरजेचे होते. या परीक्षेतील गुणानुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतात. परीक्षाच नसल्याने गुणदान कसे होईल, हे अद्याप निश्चित नाही. यामध्ये स्पष्टता यायला हवी.

- दीपक देशमुख, पालक

००००

कोरोनामुळे सीबीएसईने दहावीची परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पास करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेक कसोट्यांवर खरा कसा उतरेल, याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे. परीक्षा नसल्याने गुणदान पद्धत ठरविताना अनेक अडचणी येऊ शकतात. मेरिट लिस्टनुसार पुढच्या वर्गात प्रवेश देताना संभ्रम राहील.

सतीश सांगळे, शिक्षक

००००

अकरावी प्रवेशाबाबत द्विधास्थिती

सीबीएसईने दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास केले. मेरिट लिस्टनुसार अकरावी, आयटीआयचे प्रवेश नेमके कसे होणार, हे स्पष्ट नाही. प्रवेश परीक्षा घेऊन कदाचित प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी, याबाबत स्पष्टता हवी.

००

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

पेपर सोडविल्यानुसार विद्यार्थ्यांना गुण मिळतात. दहावीतील गुणानुसार, त्याला कोणत्या शाखेला प्रवेश द्यावयाचा याचा निर्णय सुलभ होऊ शकतो. परीक्षा नसल्यामुळे गुणदान समपातळीवर आणण्यासाठी प्रवेश परीक्षा होऊ शकते.