शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ...

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रमावस्था निर्माण केली आहे. परीक्षा न घेता सीबीएसईच्या दहावीतील विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास झाले आहेत. या निर्णयाबाबत पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५५० विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत. कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. याचा फटका शिक्षण क्षेत्राला जबर बसला असून, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शेवटी सीबीएसईने परीक्षा न घेताच दहावीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले आहेत.

००००

पालक काय म्हणतात...

कोरोनामुळे परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले, ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही संभ्रम निर्माण करणारी आहे. तंत्रनिकेतन किंवा अन्य शाखेत कोणत्या आधार प्रवेश होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

- माणिक इंगळे, पालक,

०००

कोरोनामुळे ऑनलाइन वर्ग झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेता आल्या असता, परीक्षा न घेता पास करणे तेवढे उचित नाही. विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

- विनोद वानखडे,पालक

०००

दहावीच्या परीक्षा होणे गरजेचे होते. या परीक्षेतील गुणानुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतात. परीक्षाच नसल्याने गुणदान कसे होईल, हे अद्याप निश्चित नाही. यामध्ये स्पष्टता यायला हवी.

- दीपक देशमुख, पालक

००००

कोरोनामुळे सीबीएसईने दहावीची परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पास करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेक कसोट्यांवर खरा कसा उतरेल, याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे. परीक्षा नसल्याने गुणदान पद्धत ठरविताना अनेक अडचणी येऊ शकतात. मेरिट लिस्टनुसार पुढच्या वर्गात प्रवेश देताना संभ्रम राहील.

सतीश सांगळे, शिक्षक

००००

अकरावी प्रवेशाबाबत द्विधास्थिती

सीबीएसईने दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास केले. मेरिट लिस्टनुसार अकरावी, आयटीआयचे प्रवेश नेमके कसे होणार, हे स्पष्ट नाही. प्रवेश परीक्षा घेऊन कदाचित प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी, याबाबत स्पष्टता हवी.

००

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

पेपर सोडविल्यानुसार विद्यार्थ्यांना गुण मिळतात. दहावीतील गुणानुसार, त्याला कोणत्या शाखेला प्रवेश द्यावयाचा याचा निर्णय सुलभ होऊ शकतो. परीक्षा नसल्यामुळे गुणदान समपातळीवर आणण्यासाठी प्रवेश परीक्षा होऊ शकते.