शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

सीबीएसईचे ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात ...

वाशिम : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने आनंदाची बातमी दिली खरी, परंतु पुढील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभ्रमावस्था निर्माण केली आहे. परीक्षा न घेता सीबीएसईच्या दहावीतील विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता पास झाले आहेत. या निर्णयाबाबत पालकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्नच्या एकूण ९ शाळा आहेत. यामध्ये एकूण ५५० विद्यार्थी आहेत. जिल्ह्यात असलेल्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये सर्वाधिक ५ शाळा वाशिम शहरामध्ये आहेत. कोरोनामुळे २०२०-२१ या वर्षात विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले आहेत. याचा फटका शिक्षण क्षेत्राला जबर बसला असून, शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शेवटी सीबीएसईने परीक्षा न घेताच दहावीतील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५५० विद्यार्थी परीक्षा न देता उत्तीर्ण झाले आहेत.

००००

पालक काय म्हणतात...

कोरोनामुळे परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित केले, ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही संभ्रम निर्माण करणारी आहे. तंत्रनिकेतन किंवा अन्य शाखेत कोणत्या आधार प्रवेश होणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

- माणिक इंगळे, पालक,

०००

कोरोनामुळे ऑनलाइन वर्ग झाले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेता आल्या असता, परीक्षा न घेता पास करणे तेवढे उचित नाही. विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

- विनोद वानखडे,पालक

०००

दहावीच्या परीक्षा होणे गरजेचे होते. या परीक्षेतील गुणानुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतात. परीक्षाच नसल्याने गुणदान कसे होईल, हे अद्याप निश्चित नाही. यामध्ये स्पष्टता यायला हवी.

- दीपक देशमुख, पालक

००००

कोरोनामुळे सीबीएसईने दहावीची परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना पास करण्याचा घेतलेला निर्णय हा अनेक कसोट्यांवर खरा कसा उतरेल, याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे. परीक्षा नसल्याने गुणदान पद्धत ठरविताना अनेक अडचणी येऊ शकतात. मेरिट लिस्टनुसार पुढच्या वर्गात प्रवेश देताना संभ्रम राहील.

सतीश सांगळे, शिक्षक

००००

अकरावी प्रवेशाबाबत द्विधास्थिती

सीबीएसईने दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास केले. मेरिट लिस्टनुसार अकरावी, आयटीआयचे प्रवेश नेमके कसे होणार, हे स्पष्ट नाही. प्रवेश परीक्षा घेऊन कदाचित प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी, याबाबत स्पष्टता हवी.

००

गुणदान समपातळीवर कसे आणणार?

पेपर सोडविल्यानुसार विद्यार्थ्यांना गुण मिळतात. दहावीतील गुणानुसार, त्याला कोणत्या शाखेला प्रवेश द्यावयाचा याचा निर्णय सुलभ होऊ शकतो. परीक्षा नसल्यामुळे गुणदान समपातळीवर आणण्यासाठी प्रवेश परीक्षा होऊ शकते.