शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वर्षभरात ५४३ जणांना सर्पदंश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:48 IST

संतोष वानखडे वाशिम : गतवर्षभरात जिल्ह्यातील ५४३ जणांना सापाने दंश केला असून, यापैकी दोन जणांचा जागीच तर एका जणाचा ...

संतोष वानखडे

वाशिम : गतवर्षभरात जिल्ह्यातील ५४३ जणांना सापाने दंश केला असून, यापैकी दोन जणांचा जागीच तर एका जणाचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सापाने दंश केल्यानंतर मृत्यू ओढवण्याच्या घटनेत कमालीची घट झाली आहे.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसात शेतात साप चावण्याच्या घटना घडतात. सापापासून बचाव म्हणून शेतात काम करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वाशिम जिल्ह्यात विषारी सापाच्या केवळ चार प्रजाती असून काही निमविषारी साप वगळता जिल्ह्यात प्रामुख्याने धामण, दिवड, कवड्या, डुरक्या घोणस, गवत्या, तस्कर, नानेटी, धूळनागीण, कुकरी, सळई इत्यादी बिनविषारी साप आढळून येतात. अनेकवेळा घाबरून किंवा स्वत:च्या संरक्षणासाठी साप चावतो. गत वर्षभरात जिल्ह्यात ५४३ जणांना सापाने दंश केला. यापैकी दोन जणांचा दवाखान्यात येण्यापूर्वीच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी मेडशी येथील एकाचा अकोला येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. घराजवळ तसेच शेतात साप आढळला तर सर्पमित्रांना बोलवा आणि त्यांचे संवर्धन करण्यास मदत करा, असा सल्ला सर्पमित्र, डॉक्टरांनी दिला.

०००००

साप आढळला तर!

१) सापाला ठार न करता आणि न डिवचता सर्पमित्राला पाचारण करावे.

२) साप एका जागेवर थांबत नाही, म्हणून त्याच्यावर सतत लक्ष ठेवावे.

३) सापजवळ जाण्याचे टाळून त्याचा व स्वत:चा बचाव करावा.

साप चावल्यावर काय दक्षता घ्यावी

१) सर्पदंश झाल्यावर सुरुवातीचा एक तास हा रुग्णासाठी वेदनादायक असतो.

२) सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्या व्यक्तीस धीर द्यावा, जास्त चालणे, झोपणे टाळावे.

३) जखम जंतूनाशकाने स्वच्छ करावी.

४) शक्य तेवढ्या लवकर रुग्णालयात दाखल व्हावे

००००

कोट

जिल्ह्यात वर्षभरात ५४३ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. दवाखान्यात आल्यानंतर योग्य उपचार करून सर्पदंश झालेला व्यक्ती लवकरात लवकर बरा होतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर घाबरून न जाता शक्य तेवढ्या लवकर दवाखान्यात यावे.

- डॉ. अनिल कावरखे

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

००००

कोट

जिल्ह्यात केवळ चारच प्रमुख विषारी साप आहेत. जैवविविधता जपण्यासाठी सापांचे अस्तित्व अतिआवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे घर परिसरात साप आढळल्यास सर्पमित्राशी संपर्क साधावा.

- सर्वेश फुलउंबरकर

सर्पमित्र तथा वन्यजीवरक्षक, वाशिम