शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तक्रारीअभावी ५ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:29 IST

Washim Agriculture News ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी ७२ तासां  कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करणे आवश्यक असताना जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांना यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. त्यात काढणी पश्चात सोयाबीनचे नुकसान खूप झाले. या पिकासाठी जिल्ह्यातील १४६६३९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.  परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पीकविम्यातून भरपाई करण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना ७२ तासांत ऑनलाईन पोर्टलवर किंवा ऑफलाईन पद्धतीने कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ११५९४ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नुकसान झाल्याबाबत कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. 

नुकसानाचे ९३ टक्के पंचनामे  जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी पीकविमा मिळण्यासाठी ११५०४ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर पीकविमा कंपनीकडून नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाभरात १०३ प्रतिनिधींची नियुक्ती केली. या प्रतिनिधींनी गावागावात पोहोचत पंचनाम्यांना वेग दिला. तथापि, तांत्रिक अडचणींमुळे आजवर ९३ टक्केच पंचनामे होऊ शकले. 

पीकविमा भरणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. या संदर्भात १४६५३९ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. निकषानुसार त्यांनाच पीकविम्याचा लाभ मिळेल.  -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती