शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

तक्रारीअभावी ५ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:29 IST

Washim Agriculture News ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी ७२ तासां  कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करणे आवश्यक असताना जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी १५ दिवसही तक्रार न केल्याने त्यांना आता पीकविम्यापासून वंचित राहावे लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांना यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठा फटका बसला. त्यात काढणी पश्चात सोयाबीनचे नुकसान खूप झाले. या पिकासाठी जिल्ह्यातील १४६६३९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.  परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पीकविम्यातून भरपाई करण्यासाठी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना ७२ तासांत ऑनलाईन पोर्टलवर किंवा ऑफलाईन पद्धतीने कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ११५९४ शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नुकसान झाल्याबाबत कृषी विभाग किंवा पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. 

नुकसानाचे ९३ टक्के पंचनामे  जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानापोटी पीकविमा मिळण्यासाठी ११५०४ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर पीकविमा कंपनीकडून नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाभरात १०३ प्रतिनिधींची नियुक्ती केली. या प्रतिनिधींनी गावागावात पोहोचत पंचनाम्यांना वेग दिला. तथापि, तांत्रिक अडचणींमुळे आजवर ९३ टक्केच पंचनामे होऊ शकले. 

पीकविमा भरणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. त्यांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. या संदर्भात १४६५३९ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. निकषानुसार त्यांनाच पीकविम्याचा लाभ मिळेल.  -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती