शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

वाशिम जिल्ह्यात ४६ सेंद्रिय शेती गटांची होणार निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 14:29 IST

वाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे एका शेतकºयास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यंत लाभ घेता येईल. गटात समाविष्ठ होणाºया शेतकºयांकडे किमान २ पशुधन असावे. तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक शेतकरी, सेंद्रिय शेती गटांना ६ जून २०१९ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे प्रस्ताव सादर सादर करावे लागणार आहेत.सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी ४६ गटांची निवड केली जाणार आहे. गटात भाग घेणाº्या शेतकº्यांनी तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहणार आहे. एका शेतकºयास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यंत लाभ घेता येईल. रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे.  यापूर्वी सेंद्रिय शेती कार्यक्रमात भाग घेतलेले शेतकरी गट, एका गावातील पूर्ण गट हा महिलांचा होत असल्यास त्यांना प्राधान्य राहणार आहे. आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या गट अथवा समूह शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गट, संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी संसद ग्राम योजने अंतर्गत निवडलेल्या गावांमधील गटांना प्राधान्य राहणार आहे. गटात समाविष्ठ होणाºया शेतकºयांकडे किमान २ पशुधन असावे. कोरडवाहू व बागायती क्षेत्राचे स्वतंत्र गट करावे लागणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याने दरवर्षी माती, पाणी तपासून घेणे बंधनकारक राहणार आहे. इच्छुक शेतकरी गटांनी ६ जून २०१९ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर सादर करावे, असे आवाहन ‘आत्मा’ कार्यालयाच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती