शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
3
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
4
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
5
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
6
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
7
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
8
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
9
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
10
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
11
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
12
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
13
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
14
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
15
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
16
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
17
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
18
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
19
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
20
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण

वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:54 IST

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्दे ५१० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजना प्रस्तावित.त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. विहिर, बोअर अधिग्रहणासाठी ४२ ग्रामपंचायतचे प्रस्ताव निकाली काढले असून, ४५ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले.

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, संभाव्य टंचाई लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतने उपाययोजनेच्या १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे विहिर अधिग्रहण, टँकर व अन्य उपाययोजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी गुरूवारी केल्या.

गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टंचाईग्रस्त गावांत उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, ग्रामपंचायतकडून प्राप्त प्रस्तावानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. ५१० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजना प्रस्तावित असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. विहिर, बोअर अधिग्रहणासाठी ४२ ग्रामपंचायतचे प्रस्ताव निकाली काढले असून, ४५ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील १८ गावांत २० विहिर, बोअर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यातील ३ गावांत चार विहिर, बोअर अधिग्रहण, मानोरा तालुक्यातील १४ गावांत १४ विहिर, बोअर अधिग्रहण, कारंजा तालुक्यातील सात गावांत सात विहिर, बोअर अधिग्रहण करण्यात आले आहेत. तसेच आठ गावांत आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील दोन गावे, मानोरा तालुक्यातील चार गावे आणि कारंजा तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. 

दरम्यान, जेथे पाणीटंचाई उद्भवणार आहे, अशा ग्रामपंचायतच्या सचिवांनी १५ दिवसांपूर्वी उपाययोजनेसंदर्भात संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपाययोजना करता येतील. त्यामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांनी गावातील पाणीटंचाईसंदर्भात सतर्क राहून १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केल्या. प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित गावात उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात संबंधित कर्मचाºयांची हयगय, दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद