शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:54 IST

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्दे ५१० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजना प्रस्तावित.त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. विहिर, बोअर अधिग्रहणासाठी ४२ ग्रामपंचायतचे प्रस्ताव निकाली काढले असून, ४५ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले.

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, संभाव्य टंचाई लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतने उपाययोजनेच्या १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे विहिर अधिग्रहण, टँकर व अन्य उपाययोजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी गुरूवारी केल्या.

गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टंचाईग्रस्त गावांत उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, ग्रामपंचायतकडून प्राप्त प्रस्तावानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. ५१० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजना प्रस्तावित असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. विहिर, बोअर अधिग्रहणासाठी ४२ ग्रामपंचायतचे प्रस्ताव निकाली काढले असून, ४५ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील १८ गावांत २० विहिर, बोअर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यातील ३ गावांत चार विहिर, बोअर अधिग्रहण, मानोरा तालुक्यातील १४ गावांत १४ विहिर, बोअर अधिग्रहण, कारंजा तालुक्यातील सात गावांत सात विहिर, बोअर अधिग्रहण करण्यात आले आहेत. तसेच आठ गावांत आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील दोन गावे, मानोरा तालुक्यातील चार गावे आणि कारंजा तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. 

दरम्यान, जेथे पाणीटंचाई उद्भवणार आहे, अशा ग्रामपंचायतच्या सचिवांनी १५ दिवसांपूर्वी उपाययोजनेसंदर्भात संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपाययोजना करता येतील. त्यामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांनी गावातील पाणीटंचाईसंदर्भात सतर्क राहून १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केल्या. प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित गावात उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात संबंधित कर्मचाºयांची हयगय, दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद