शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:54 IST

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्दे ५१० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजना प्रस्तावित.त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. विहिर, बोअर अधिग्रहणासाठी ४२ ग्रामपंचायतचे प्रस्ताव निकाली काढले असून, ४५ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले.

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, संभाव्य टंचाई लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतने उपाययोजनेच्या १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे विहिर अधिग्रहण, टँकर व अन्य उपाययोजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी गुरूवारी केल्या.

गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टंचाईग्रस्त गावांत उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, ग्रामपंचायतकडून प्राप्त प्रस्तावानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. ५१० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजना प्रस्तावित असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. विहिर, बोअर अधिग्रहणासाठी ४२ ग्रामपंचायतचे प्रस्ताव निकाली काढले असून, ४५ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील १८ गावांत २० विहिर, बोअर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यातील ३ गावांत चार विहिर, बोअर अधिग्रहण, मानोरा तालुक्यातील १४ गावांत १४ विहिर, बोअर अधिग्रहण, कारंजा तालुक्यातील सात गावांत सात विहिर, बोअर अधिग्रहण करण्यात आले आहेत. तसेच आठ गावांत आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील दोन गावे, मानोरा तालुक्यातील चार गावे आणि कारंजा तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. 

दरम्यान, जेथे पाणीटंचाई उद्भवणार आहे, अशा ग्रामपंचायतच्या सचिवांनी १५ दिवसांपूर्वी उपाययोजनेसंदर्भात संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपाययोजना करता येतील. त्यामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांनी गावातील पाणीटंचाईसंदर्भात सतर्क राहून १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केल्या. प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित गावात उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात संबंधित कर्मचाºयांची हयगय, दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद