शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

वाशिम जिल्ह्यात ३५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्य टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:51 IST

वाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे२९ प्रकल्पात १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठारब्बी हंगाम धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकबूर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून, १२८ लघू प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातील तब्बल ३५ प्रकल्पांची पाणीपातळी आजमितीस शून्यावर पोहोचली आहे; तर २९ प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, उर्वरित प्रकल्पांमधील पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरायला हवे, याबाबत पूर्वनियोजन म्हणून पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले असून, सिंचनाकरिता पाणी सोडणे सक्तीने बंद करण्यात आले आहे. परिणामी, सिंचन प्रकल्पांमधील पाण्याच्या भरोशावर शेती कसणार्‍या शेतकर्‍यांसमोर बिकट संकट उभे ठाकले आहे. यामुळेच तोंडावर असलेला रब्बी हंगाम पूर्णत: धोक्यात सापडला आहे. 

सिंचनाकरिता पाणी मिळण्याबाबत संतप्त शेतकरी धडकले लघु पाटबंधारेच्या कार्यालयावर!सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेऊन अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकर्‍यांनी सोमवारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा केली. अडोळ प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १२.८९ दलघमीची असून, आजमितीस या प्रकल्पात २.७६ दलघमी पाणी शिल्लक आहे. तेदेखील पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून, या प्रकल्पावरून रिसोड शहरासह काही खेड्यांना पाणी पुरविले जात आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्यांना पाणी मिळेनासे झाल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी करून किमान हरभरा पिकासाठी पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, यावर्षी पर्जन्यमान घटल्यामुळे पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य दिले जात असून, सिंचनाकरिता पाणी पुरवावे, एवढा साठा प्रकल्पात शिल्लक नसल्यामुळेच ही बाब अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी