शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

वाशिम जिल्ह्यात ३५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्य टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:51 IST

वाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे२९ प्रकल्पात १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठारब्बी हंगाम धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकबूर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून, १२८ लघू प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातील तब्बल ३५ प्रकल्पांची पाणीपातळी आजमितीस शून्यावर पोहोचली आहे; तर २९ प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, उर्वरित प्रकल्पांमधील पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरायला हवे, याबाबत पूर्वनियोजन म्हणून पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले असून, सिंचनाकरिता पाणी सोडणे सक्तीने बंद करण्यात आले आहे. परिणामी, सिंचन प्रकल्पांमधील पाण्याच्या भरोशावर शेती कसणार्‍या शेतकर्‍यांसमोर बिकट संकट उभे ठाकले आहे. यामुळेच तोंडावर असलेला रब्बी हंगाम पूर्णत: धोक्यात सापडला आहे. 

सिंचनाकरिता पाणी मिळण्याबाबत संतप्त शेतकरी धडकले लघु पाटबंधारेच्या कार्यालयावर!सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेऊन अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकर्‍यांनी सोमवारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा केली. अडोळ प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १२.८९ दलघमीची असून, आजमितीस या प्रकल्पात २.७६ दलघमी पाणी शिल्लक आहे. तेदेखील पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून, या प्रकल्पावरून रिसोड शहरासह काही खेड्यांना पाणी पुरविले जात आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्यांना पाणी मिळेनासे झाल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी करून किमान हरभरा पिकासाठी पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, यावर्षी पर्जन्यमान घटल्यामुळे पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य दिले जात असून, सिंचनाकरिता पाणी पुरवावे, एवढा साठा प्रकल्पात शिल्लक नसल्यामुळेच ही बाब अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी