शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिम जिल्ह्यात ३५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्य टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:51 IST

वाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे२९ प्रकल्पात १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठारब्बी हंगाम धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकबूर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून, १२८ लघू प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातील तब्बल ३५ प्रकल्पांची पाणीपातळी आजमितीस शून्यावर पोहोचली आहे; तर २९ प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, उर्वरित प्रकल्पांमधील पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरायला हवे, याबाबत पूर्वनियोजन म्हणून पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले असून, सिंचनाकरिता पाणी सोडणे सक्तीने बंद करण्यात आले आहे. परिणामी, सिंचन प्रकल्पांमधील पाण्याच्या भरोशावर शेती कसणार्‍या शेतकर्‍यांसमोर बिकट संकट उभे ठाकले आहे. यामुळेच तोंडावर असलेला रब्बी हंगाम पूर्णत: धोक्यात सापडला आहे. 

सिंचनाकरिता पाणी मिळण्याबाबत संतप्त शेतकरी धडकले लघु पाटबंधारेच्या कार्यालयावर!सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेऊन अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकर्‍यांनी सोमवारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा केली. अडोळ प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १२.८९ दलघमीची असून, आजमितीस या प्रकल्पात २.७६ दलघमी पाणी शिल्लक आहे. तेदेखील पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून, या प्रकल्पावरून रिसोड शहरासह काही खेड्यांना पाणी पुरविले जात आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्यांना पाणी मिळेनासे झाल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी करून किमान हरभरा पिकासाठी पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, यावर्षी पर्जन्यमान घटल्यामुळे पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य दिले जात असून, सिंचनाकरिता पाणी पुरवावे, एवढा साठा प्रकल्पात शिल्लक नसल्यामुळेच ही बाब अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी