शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यात ३५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्य टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:51 IST

वाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे२९ प्रकल्पात १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठारब्बी हंगाम धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात ३ मध्यम आणि १२८ लघू, असे एकंदरित १३१ प्रकल्प असून, निम्म्या प्रकल्पांमधील पाणीसाठा १0 टक्क्यांपयर्ंत घटला आहे. काही प्रकल्पांची पाणीपातळी तर शून्यावर आल्याने रब्बी हंगाम धोक्यात सापडला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकबूर्जी, सोनल आणि अडाण असे तीन मध्यम प्रकल्प असून, १२८ लघू प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातील तब्बल ३५ प्रकल्पांची पाणीपातळी आजमितीस शून्यावर पोहोचली आहे; तर २९ प्रकल्पांमध्ये १0 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, उर्वरित प्रकल्पांमधील पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत पुरायला हवे, याबाबत पूर्वनियोजन म्हणून पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले असून, सिंचनाकरिता पाणी सोडणे सक्तीने बंद करण्यात आले आहे. परिणामी, सिंचन प्रकल्पांमधील पाण्याच्या भरोशावर शेती कसणार्‍या शेतकर्‍यांसमोर बिकट संकट उभे ठाकले आहे. यामुळेच तोंडावर असलेला रब्बी हंगाम पूर्णत: धोक्यात सापडला आहे. 

सिंचनाकरिता पाणी मिळण्याबाबत संतप्त शेतकरी धडकले लघु पाटबंधारेच्या कार्यालयावर!सिंचन प्रकल्पात पाणी असूनही ते रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी मिळणे दुरापास्त झाल्यामुळे नापिकीचे संकट उभे ठाकले आहे. ही बाब लक्षात घेऊन अडोळ सिंचन प्रकल्पातील पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी असंख्य शेतकर्‍यांनी सोमवारी लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा केली. अडोळ प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता १२.८९ दलघमीची असून, आजमितीस या प्रकल्पात २.७६ दलघमी पाणी शिल्लक आहे. तेदेखील पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले असून, या प्रकल्पावरून रिसोड शहरासह काही खेड्यांना पाणी पुरविले जात आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्यांना पाणी मिळेनासे झाल्याचा आरोप यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी करून किमान हरभरा पिकासाठी पाणी पुरविण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. दरम्यान, यावर्षी पर्जन्यमान घटल्यामुळे पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य दिले जात असून, सिंचनाकरिता पाणी पुरवावे, एवढा साठा प्रकल्पात शिल्लक नसल्यामुळेच ही बाब अशक्य असल्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी