शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्ह्यातील ३४ आदिवासी गावे विकासापासून अद्याप दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST

‘ट्रायबल रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र’कडून निवड करण्यात आलेल्या आदिवासी गावांच्या विकासाकरिता मंजूर केला जाणारा निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, ...

‘ट्रायबल रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र’कडून निवड करण्यात आलेल्या आदिवासी गावांच्या विकासाकरिता मंजूर केला जाणारा निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, सार्वजनिक शौचालये, मंगल कार्यालय, समाज मंदिर, पाणीपुरवठा, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, शालेय इमारत खोली बांधकाम, स्मशानभूमी शेड, पथदिवे, सौरऊर्जा आदी सार्वजनिक सुविधांवर खर्च करून आदिवासीबहुल गावांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत; परंतु शेवटच्या घटकापर्यंत त्याची चोख अंमलबजावणी होणे अशक्य झाले असून आदिवासी गावांच्या विकासालाही यामुळे बहुतांशी ‘ब्रेक’ लागला आहे.

जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पिंपळवाडी, खैरखेडा, भामटवाडी, गांगलवाडी, वाकळवाडी, कोळदरा, काळाकामठा, उमरवाडी, मुंगळा, मालेगाव किन्ही, धरमवाडी, पिंपळशेंडा, वाडी रामराव, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, धमधमी, कवरदरी, उदी, भिलदुर्ग भौरद आणि सवडद अशी २२ गावे आदिवासीबहुल आहेत. यासह मानोरा तालुक्यात गिराटा, विळेगाव, पिंपळशेंडा, ढोणी, खांबाळा, मेंद्रा, वटफळ, रुई, उज्वलनगर, पाळोदी, रंजीतनगर आणि रतनवाडी अशी १२ गावे आदिवासीबहुल आहेत.

तथापि, काही गावांचा अपवाद वगळता आजही दुर्गम परिसरात असलेल्या बहुतांश आदिवासी गावांना मुख्य रस्त्यापर्यंत जोडण्यासाठी मजबूत तथा दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध झालेली नाही. शिक्षणाच्या बाबतीत ही गावे आजही मागासलेली आहे. स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असून रोजगाराअभावी अन्य गावांच्या तुलनेत ही गावे पिछाडीवर पडली आहेत. विकासात्मक योजनांची अंमलबजावणी चोखपणे होत नसल्याने आदिवासी समाजातील नागरिकांना आजही गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

...................

कोट :

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात येतील. या गावांच्या विकासाकरिता निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील.

- शैलेश हिंगे

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

..................

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आदिवासीबहुल गावे आहेत; मात्र मालेगाव आणि मानोरा या दोन तालुक्यांमध्ये तुलनेने हे प्रमाण अधिक आहे. शिक्षण, आरोग्य यासह इतरही बाबतीत ही गावे आजही मागासलेली आहेत. शासनाने या गावांसाठी भरीव निधीची तरतूद करायला हवी व प्रशासनाने शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवण्याचा प्रयत्न करायला हवा.

आनंद पवार

जिल्हाध्यक्ष, आदिवासी विकास परिषद