शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वाशिम जिल्ह्यातील २८८ युवक आत्मनिर्भर; १६.७९ कोटी रुपयांचे कर्जवाटप

By दिनेश पठाडे | Updated: March 13, 2023 15:31 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

वाशिम : मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, युवक सक्षम बनावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत विविध व्यवसायासाठी कर्जपुरवठा केला जातो. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर महामंडळाकडून व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे कर्जदारांना केवळ मुद्दल भरावी लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ युवकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून बँकांनी १६ कोटी ७९ लाख १० हजार ४६३ रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, व्यवसायामध्ये उभारी घेता यावी, यासाठी वैयक्तिक कर्ज योजना राबविली जाते. या अंतर्गत युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याने युवकांना व्यवसाय उभारता येत आहे. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती. 

महामंडळाचे कर्ज घेणाऱ्यांचे वाढते प्रमाण, नियमित कर्जफेड करणाऱ्यास मिळणार प्रतिसाद लक्षात घेऊन महामंडळाने व्याज परतावा योजनेची मर्यादा  १५ लाखापर्यंत केली आहे. या अंतर्गत व्याज परतावा ४ लाख ५० हजार मर्यादेत केला जात आहे. जिल्ह्याला २०२२-२३ या आर्थिक वर्षात किमान ३०० कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २८८ जणांना कर्जवाटप करण्यात आले आहे. महामंडळामार्फत कर्जाचा लाभ घेण्यासाठी ८१७ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी २८८ लाभार्थींना त्या-त्या बँकेकडून कर्ज मिळाले. बँकेत असलेले प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत.

१.६४ कोटींचा व्याज परतावाअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून पंधरा लाख रुपये कर्जापर्यंत व्याज परतावा ४ लाख ५० हजार रुपये मर्यादेपर्यंत केला जातो. आतापर्यंत महामंडळाने व्याज परताव्यापोटी १ कोटी ६४ लाख ५९ हजार ९८२ रुपये बँकांना अदा केले आहेत. 

टॅग्स :washimवाशिम