शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

जिल्ह्यातील २६ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

पावसाळा निम्मा उलटला असतानाही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने १५ जुलैपर्यंतही प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरच ...

पावसाळा निम्मा उलटला असतानाही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने १५ जुलैपर्यंतही प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरच होती. त्यात ३५ पेक्षा अधिक प्रकल्पांत २५ टक्केही जलसाठा झाला नव्हता. जून महिन्याच्या अखेरपासून पावसाने खंड दिल्याने प्रकल्पांच्या पातळीत किंचितही वाढ होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट ओढवते की काय, अशी भीतीही वाटू लागली होती. दरम्यान, जिल्ह्यात १२ जुलैपासून पावसाने ठाणच मांडले. सतत पडत असलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी प्रकल्पांच्या पातळीला मोठा आधार मिळाला आणि अवघ्या १० दिवसांत प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरून वाढत ५२.३१ टक्क्यांवर पोहोचली. त्यात ३ मध्यम प्रकल्पांची सरासरी पातळी ६५.६० टक्के आहे. शिवाय २६ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले, तर १३ प्रकल्पात ७५ ते ९९ टक्के, २३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर ३६ प्रकल्पात २५ ते ५० टक्के जलसाठा झाला आहे.

----------

२३ प्रकल्पात ठणठणाटच

जिल्ह्यातील १३७ पैकी २६ प्रकल्प शंभर टक्के भरले, तर ५२ प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला असला तरी ३८ प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. त्यात १२ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, ३ प्रकल्पात १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे, तर २३ प्रकल्पांत अद्यापही ठणठणाटच आहे. त्यामुळे संबंधित भागांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या गंभीर होऊ शकते.

----------

मानोरा तालुक्याची स्थिती दमदार

जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असली तरी जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती सर्वात चांगली आहे. या तालुक्यातील १३ प्रकल्प शंभर टक्के भरले असून, तालुक्यातील २५ प्रकल्पात सरासरी ८२ टक्के जलसाठा झाला आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे.

--------------------------

वाशिम तालुक्याची स्थिती गंभीर

जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असताना वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील १९ प्रकल्पांत मृतसाठाच आहे, तसेच २ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी, तर ५ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असून, या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे. तालुक्यातील ३६ प्रकल्प मिळून केवळ १८.४३ टक्के जलसाठा झाला आहे.

लघू प्रकल्पांतील तालुकानिहाय जलसाठा

तालुका - प्रकल्प - जलसाठा (टक्के)

वाशिम - ३६ - १८.४३

मालेगाव - २३ - ६५.३९

रिसोड - १९ - ३३.१८

मं.पीर. - १५ - ६३.०६

मानोरा - २५ - ८१.८९

कारंजा - १६ - ५३.७३

--------------------------

मध्यम प्रकल्पांची पातळी

प्रकल्प - पातळी (टक्के)

एक बुर्जी - ८९.६४

सोनल - ६१.४७

अडाण - ६२.३६