शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

२४ तासांत वीज जोडणीचा निर्णय हवेतच विरला!

By admin | Updated: May 15, 2017 01:25 IST

ग्राहकांची गैरसोय थांबेना : अर्ज करूनही मिळत नाही ‘कनेक्शन’

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : नवीन वीज जोडणी घ्यायची असेल, तर किमान सहा महिने लागतात. या किचकट प्रक्रियेला फाटा देत महावितरणने २४ तासांत वीज जोडणी देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, तो हवेतच विरला असून, तांत्रिक अडचणींचे कारण समोर करून ‘कनेक्शन’ देण्यास विलंब लागत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘मोबाइल अ‍ॅप’ आणि ‘आॅनलाइन’ प्रक्रियेचा आधार घेत जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा येथून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती. यानुसार, ग्राहकांना वीज मागणी अर्ज देण्याची गरज नाही. अर्ज आॅनलाइन तथा मोबाइल अ‍ॅपद्वारे करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे, असे महावितरणने जाहीर केले होते. २४ तासांत वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्त्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. वाशिम शहरामध्ये रॉयल प्लाझा डी.पी., राणी लक्ष्मीबाई शाळा, बस स्टॅण्डजवळ, बोरा आॅइल मिल, शेळके हॉस्पिटल, बस स्टँड बुस्टर, गाभणे हॉस्पिटल, माउलीनगर, आंबेडकर चौक, न्यू अल्लाडा प्लॉट, वाशिमकर कॉम्प्लेक्स, पी.डब्ल्यू.डी. आॅफीस, न्यू गव्हाणकरनगर, व्यंकटेश कॉलनी, कलेक्टर आॅफीस, पोल्ट्री फार्म, सिव्हिल लाइन, जवाहर कॉलनी, न्यू आय.यू.डी.पी -१, न्यू आययूडीपी- २, न्यू आययूडीपी - ३, ४, मुजूमदार हाउस, दागडे हॉस्पिटल, कानडे हॉस्पिटल, तहसील आॅफीस, अल्लाडा प्लॉट, तिरुपती सिटी व नंदनवन कॉलनी, सर्किट हाउस, योजना कॉलनी, सुंदर वाटिका, ओरा हॉस्पिटल, दंडे हॉस्पिटल, बाहेती हॉस्पिटल, वाटाणेवाडी, बीसीएच होस्टेल, राधाकृष्णनगर, निकाल होस्टेल आदी ठिकाणी राहणाऱ्या ग्राहकांना २४ तासांत नवीन वीज कनेक्शन दिले जाणार होते. मात्र, मोबाइल अ‍ॅप आणि आॅनलाइनविषयी जनजागृतीच नसल्यामुळे या उपक्रमास प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. महावितरणने वीज कनेक्शनसाठी ‘मोबाइल अ‍ॅप’ आणि ‘आॅनलाइन’ प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांकडून त्यास प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. कागदोपत्री प्रक्रियेमुळे निश्चितपणे कनेक्शन द्यायला वेळ लागत आहे. ग्राहकांनी याकामी सहकार्य करायला हवे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण