शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

रोजी गेली, तरी २.३० लाख कुटुंबांना मिळणार रोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST

देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गतवर्षी लॉकडाऊनदरम्यान अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील ...

देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गतवर्षी लॉकडाऊनदरम्यान अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थींना मोफत धान्याचा लाभ देण्यात आला होता. यंदादेखील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून निर्बंध कठोर केले आहेत. या दरम्यान गोरगरीब लाभार्थींना दिलासा म्हणून रेशनचे धान्य एका महिन्यासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ जिल्ह्यातील दोन लाख ३० हजार ७९ कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.

००००

कोट बॉक्स

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. या दरम्यान गोरगरीब लाभाथींची गैरसोय होऊ नये म्हणून एका महिन्यासाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिलासा मिळेल.

- अरविंद वानखडे

००

मोफत धान्य मिळणार असल्याने गोरगरीब लाभार्थींमध्ये थोडेफार समाधान आहे. परंतु, रोजगार मिळणार नसल्याने चिंताही आहे. गव्हाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.

- शिवराम कांबळे

००००

शासनाने एक महिला पुरेल एवढा मोफत धान्यपुरवठा करावा. तांदळाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढवायला हवे. धान्याचा दर्जाही चांगला हवा.

- रमेश पाईकराव

०००

बॉक्स

गहू व तांदूळ मिळणार

शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केल्यानंतर यासंदर्भात पुरवठा विभागाकडून जिल्हास्तरीय यंत्रणेला अद्याप स्पष्ट सूचना अथवा निर्देश प्राप्त झाले नाहीत.

गतवर्षीप्रमाणेच एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

०००

जिल्ह्यातील एकूण लाभार्थी संख्या

२३००७९