शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

२00 जणांना अतिसाराची लागण

By admin | Updated: October 26, 2014 00:25 IST

तांदळी शेवई ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा.

वाशिम: यंदाच्या पावसाळ्यात विहिरीला नवीन पाणी आले; परंतु ग्रामपंचायत प्रशानाने विहिरीत ब्लिचिंग पावडरच टाकली नाही. तसेच आरोग्य विभागानेदेखील गावात कुठल्याही प्रकारचे आरोग्याच्या काळजीबाबत सुविधा पुरवल्या नसल्याने तांदळी शेवई येथील जवळ पास २00 जणांना अतिसाराची लागण झाली असून, त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तांदळी शेवई येथील ग्रामपंचायत प्रशासन हे गावाच्या स्वच्छतेबाबत उदासीन आहे. गावा तील नाल्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी तुंबले असून, रस्त्यावर येणार्‍या घाण पाण्यामुळे गावात डासाची उत्पत्ती वाढली आहे. तसेच ठिकठिकाणी कचर्‍याचे व घाणीचे ढिगारे साचले आहेत. स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याच ठोस उपाययोजना राबवत नाही. तसेच पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तांदळी शेवई येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यरत असले तरी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कधीच हजर नसतात. वास्तविक पाहता उपकेंद्रातील अधिकार्‍यांनी गावात आरोग्याबाबत जनजागृती करायला पाहिजे. तसेच पाण्याचे नमुने घेऊन पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याचीदेखील चाचपणी करायला पाहिजे होती. तसेच गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या रक्ताचे नमुने त पासणे तेवढेच गरजेचे आहे; परंतु आरोग्य विभागाच्या वतीने अशा कुठल्याही प्रकारच्या उ पाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. तांदळी शेवई येथील एका भागातील तब्बल २00 ते २५0 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. त्यामध्ये लहान बालकांचादेखील बर्‍यापैकी समावेश आहे. याबाबत पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सदर आजार हा दूषित पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.*अधिकारी व सचिवावर कार्यवाहीची मागणी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा दाखवणार्‍या ग्रामपंचायत सचिव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी जि. प. सदस्य विजया मानमोठे यांनी केली आहे.