शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

२00 जणांना अतिसाराची लागण

By admin | Updated: October 26, 2014 00:25 IST

तांदळी शेवई ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा.

वाशिम: यंदाच्या पावसाळ्यात विहिरीला नवीन पाणी आले; परंतु ग्रामपंचायत प्रशानाने विहिरीत ब्लिचिंग पावडरच टाकली नाही. तसेच आरोग्य विभागानेदेखील गावात कुठल्याही प्रकारचे आरोग्याच्या काळजीबाबत सुविधा पुरवल्या नसल्याने तांदळी शेवई येथील जवळ पास २00 जणांना अतिसाराची लागण झाली असून, त्यांच्यावर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तांदळी शेवई येथील ग्रामपंचायत प्रशासन हे गावाच्या स्वच्छतेबाबत उदासीन आहे. गावा तील नाल्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी तुंबले असून, रस्त्यावर येणार्‍या घाण पाण्यामुळे गावात डासाची उत्पत्ती वाढली आहे. तसेच ठिकठिकाणी कचर्‍याचे व घाणीचे ढिगारे साचले आहेत. स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याच ठोस उपाययोजना राबवत नाही. तसेच पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तांदळी शेवई येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यरत असले तरी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कधीच हजर नसतात. वास्तविक पाहता उपकेंद्रातील अधिकार्‍यांनी गावात आरोग्याबाबत जनजागृती करायला पाहिजे. तसेच पाण्याचे नमुने घेऊन पाणी पिण्यायोग्य आहे की, नाही याचीदेखील चाचपणी करायला पाहिजे होती. तसेच गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या रक्ताचे नमुने त पासणे तेवढेच गरजेचे आहे; परंतु आरोग्य विभागाच्या वतीने अशा कुठल्याही प्रकारच्या उ पाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. तांदळी शेवई येथील एका भागातील तब्बल २00 ते २५0 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. त्यामध्ये लहान बालकांचादेखील बर्‍यापैकी समावेश आहे. याबाबत पार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सदर आजार हा दूषित पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.*अधिकारी व सचिवावर कार्यवाहीची मागणी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा दाखवणार्‍या ग्रामपंचायत सचिव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी जि. प. सदस्य विजया मानमोठे यांनी केली आहे.