शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वाशिम जिल्ह्यात अडकलेले १७२७ नागरिक परतले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:55 IST

केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील ५१७१ कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केली, तर कामगार विभागाचेही सहकार्य लाभले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील, तसेच परजिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. प्रशासनाकडून अशा ५१७१ कामगारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर यातील ३४२ नागरिकांना शासन आणि प्रशासनाकडून ३१ ठिकाणी सुरू केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना केंद्र आणि राज्यशासनाकडून देण्यात आल्या आणि त्यासाठी गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना पासेस उपलब्ध करण्याच्याही सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाप्रशासनाने गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घेतली. त्यानंतर शासकीय कॅम्पमधील ३४२ नागरिक मिळून इतर ठिकाणी असलेल्या १७२७ नागरिकांना परत त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.तीन हजारांवर कामगार कंत्राटदारांच्या आश्रयातवाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी विविध राज्यातील हजारो कामगार आले आहेत. कोरोना विषाणूवर संसर्गासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही त्यातील हजारो कामगार आपापल्या राज्यात स्वगृही परतले असून, त्यात प्रशासनाच्या परवानगीने परतलेल्या १७२७ कामगारांचा समावेश असला तरी अद्यापही परराज्यातील ३४४४ कामगार जिल्ह्यात कायम असून, हे सर्व कामगार कंत्राटदार कंपनीच्या तळावर आश्रयास आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार