शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

वाशिम जिल्ह्यात अडकलेले १७२७ नागरिक परतले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:55 IST

केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील ५१७१ कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केली, तर कामगार विभागाचेही सहकार्य लाभले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील, तसेच परजिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. प्रशासनाकडून अशा ५१७१ कामगारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर यातील ३४२ नागरिकांना शासन आणि प्रशासनाकडून ३१ ठिकाणी सुरू केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना केंद्र आणि राज्यशासनाकडून देण्यात आल्या आणि त्यासाठी गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना पासेस उपलब्ध करण्याच्याही सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाप्रशासनाने गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घेतली. त्यानंतर शासकीय कॅम्पमधील ३४२ नागरिक मिळून इतर ठिकाणी असलेल्या १७२७ नागरिकांना परत त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.तीन हजारांवर कामगार कंत्राटदारांच्या आश्रयातवाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी विविध राज्यातील हजारो कामगार आले आहेत. कोरोना विषाणूवर संसर्गासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही त्यातील हजारो कामगार आपापल्या राज्यात स्वगृही परतले असून, त्यात प्रशासनाच्या परवानगीने परतलेल्या १७२७ कामगारांचा समावेश असला तरी अद्यापही परराज्यातील ३४४४ कामगार जिल्ह्यात कायम असून, हे सर्व कामगार कंत्राटदार कंपनीच्या तळावर आश्रयास आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार