शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ सधन सिंचन योजनेचा १५ हजार शेतक-यांनी घेतला लाभ

By admin | Updated: February 19, 2015 01:55 IST

सिंचनात वाढ; रिसोड तालुक्यातील सर्वाधिक शेतक-यांचा लाभ.

वाशिम : शासनाच्या कृषी विभागामार्फत विदर्भासाठी राबविण्यात येत असलेल्या विदर्भ सधन सिंचन योजनेमुळे वाशिम जिल्हय़ातील सिंचन क्षेत्रात तिप्पट वाढ झाली असून, आजवर या योजनेचा जिल्हय़ातील १५ हजार ७९७ शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने, तसेच उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी प्रभावी वापर करता यावा या उद्देशाने शासनाकडून विविध योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात विदर्भ प्रदेशासाठी २0१२-१३ पासून विदर्भ सधन सिंचन विकास योजना हा विशेष कार्यक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून, यामध्ये विदर्भातील ८ जिल्हय़ांत ही योजना राबविण्यात येत आहे. सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सुक्ष्म सिंचन मोहिमेंतर्गत विदर्भ सधन सिंचन विकास योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना मागणीप्रमाणे तुषार किंवा ठिबक सिंचनासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. शेतकर्‍याला जास्तीतजास्त दोन हेक्टरपर्यंंत या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. या योजनेत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना एकूण खर्चाच्या ७५ टक्के व दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असणार्‍यांना ५0 टक्के अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते. उर्वरित रक्कम ही शेतकर्‍याला स्वत: खर्च करावी लागते. या योजनेमुळे जिल्हय़ातील सिंचन क्षेत्रात तिप्पट वाढ झाली आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात. यामध्ये जिल्हय़ातील मंगरुळपीर येथील ३00१, कारंजा येथील २२६९, मानोरा येथील १३७९, रिसोड येथील ३५२९, मालेगाव येथील २७३७, तर वाशिम येथील २८८२ शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात आला. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत जिल्हय़ात ठिबक आणि तुषार या दोन्ही पद्धतीच्या आधारे सिंचन करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत असून, जिल्हय़ात फळ लागवडीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत जिल्हय़ाकरीता २0१२-१३ व २0१३-१४ या वर्षांसाठी एकूण १५ कोटी ७१ लाख १६ हजारांचा निधी कृषी विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आला. त्यापैकी १४ कोटी २६ लाख १६ हजार रुपये शेतकर्‍यांसाठी खर्च करण्यात आले, तर एक कोटी ४५ लाख रुपयांचा निधी अद्याप कृषी विद्यापीठाकडे शिल्लक आहे. जिल्हय़ातील या योजनेंतर्गत समाविष्ट एकूण १७ हजार ६१२ लाभार्थी शेतकर्‍यांपैकी आजवर एकूण १५ हजार ७९७ शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.