शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

विदर्भ सधन सिंचन योजनेचा १५ हजार शेतक-यांनी घेतला लाभ

By admin | Updated: February 19, 2015 01:55 IST

सिंचनात वाढ; रिसोड तालुक्यातील सर्वाधिक शेतक-यांचा लाभ.

वाशिम : शासनाच्या कृषी विभागामार्फत विदर्भासाठी राबविण्यात येत असलेल्या विदर्भ सधन सिंचन योजनेमुळे वाशिम जिल्हय़ातील सिंचन क्षेत्रात तिप्पट वाढ झाली असून, आजवर या योजनेचा जिल्हय़ातील १५ हजार ७९७ शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने, तसेच उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी प्रभावी वापर करता यावा या उद्देशाने शासनाकडून विविध योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात विदर्भ प्रदेशासाठी २0१२-१३ पासून विदर्भ सधन सिंचन विकास योजना हा विशेष कार्यक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून, यामध्ये विदर्भातील ८ जिल्हय़ांत ही योजना राबविण्यात येत आहे. सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सुक्ष्म सिंचन मोहिमेंतर्गत विदर्भ सधन सिंचन विकास योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना मागणीप्रमाणे तुषार किंवा ठिबक सिंचनासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. शेतकर्‍याला जास्तीतजास्त दोन हेक्टरपर्यंंत या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. या योजनेत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना एकूण खर्चाच्या ७५ टक्के व दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असणार्‍यांना ५0 टक्के अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते. उर्वरित रक्कम ही शेतकर्‍याला स्वत: खर्च करावी लागते. या योजनेमुळे जिल्हय़ातील सिंचन क्षेत्रात तिप्पट वाढ झाली आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात. यामध्ये जिल्हय़ातील मंगरुळपीर येथील ३00१, कारंजा येथील २२६९, मानोरा येथील १३७९, रिसोड येथील ३५२९, मालेगाव येथील २७३७, तर वाशिम येथील २८८२ शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात आला. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत जिल्हय़ात ठिबक आणि तुषार या दोन्ही पद्धतीच्या आधारे सिंचन करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत असून, जिल्हय़ात फळ लागवडीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत जिल्हय़ाकरीता २0१२-१३ व २0१३-१४ या वर्षांसाठी एकूण १५ कोटी ७१ लाख १६ हजारांचा निधी कृषी विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आला. त्यापैकी १४ कोटी २६ लाख १६ हजार रुपये शेतकर्‍यांसाठी खर्च करण्यात आले, तर एक कोटी ४५ लाख रुपयांचा निधी अद्याप कृषी विद्यापीठाकडे शिल्लक आहे. जिल्हय़ातील या योजनेंतर्गत समाविष्ट एकूण १७ हजार ६१२ लाभार्थी शेतकर्‍यांपैकी आजवर एकूण १५ हजार ७९७ शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.