शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

१४६९ उमेदवारांचे अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2015 01:22 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट; वाशिम जिल्ह्यातील १४९५ जागांसाठी ३१३३ उमेदवार रिंगणात.

वाशिम : जिल्ह्यतील १६३ ग्रामपंचायतींच्या ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीतील १५२५ सदस्यांसाठी ४९२६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीत १३0 अर्ज रद्द झाल्याने ४ हजार ७९६ उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत रिंगणात होते. २३ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४६९ उमेदवारांनी अर्ज मागे व १८३ ग्रामपंचायत सदस्य अविरोध झाल्याने ३१३३ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून निवडणुकीत उमेदवारांमध्ये रंगत रंगणार आहे. २३ जुलै रोजी अर्ज मागे घ्यावयाची तारीख असल्याने विजयात अडथळा निर्माण करणार्‍या काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांची धडपड दिसून आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हयातील १६३ ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ४९२६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्ज छाननीच्या दिवशी विविध कारणास्तव यामधील १३0 अर्ज रद्द झाल्याने ४७९६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम होते. २२ जुलै रोजी जिल्हयातील १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ४७८४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २३ जुलै रोजी १४६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले व १८३ ग्रामपंचायत सदस्य अविरोध झाल्याने आता निवडणुकीत ३१३३ उमेदवार कायम आहेत. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायतसाठी २३१ सदस्य निवडून दयावयाचे आहे, याकरिता ४0४ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. तसेच मालेगाव तालुक्यात ३0 ग्रामपंचायतीच्या होणार्‍या निवडणुकीतील २७६ जागेसाठी ६0६, मंगरूळपीर तालुक्यात २५ ग्रामपंचायत निवडणुककरिता २0९ जागेसाठी ५0२, रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतकरिता ३३४ जागेसाठी ६९७ उमेदवार, कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायसाठी २४१ जागेसाठी ४८६ तर मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतसाठी २३४ जागेसाठी ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २२ जुलै रोजी मंगरुळपीर तालुक्यातील १२ उमेदवारांनी व मालेगाव तालुक्यातील एका गावाने अर्ज मागे घेतला आहे. २३ जुलै रोजी वाशिम तालुक्यातील २३६, मालेगाव तालुक्यातील २२ जुलै रोजी १ व २३ जुलै रोजी ३१३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. रिसोड तालुक्यातील ३७४, कारंजा तालुक्यातील १५६, मंगरुळपीर तालुक्यातील २३४ , मानोरा तालुक्यातील १५६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. २३ जुलै रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्हयात होत असलेल्या १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ३१३३ उमेदवार कायम आहेत. जिल्हयातील १६३ ग्राम पंचायत होवू घातलेल्या १0 ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत. निवडणुक वातावरण तापण्यास प्रारंभ झाला असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.