शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज

By दिनेश पठाडे | Updated: April 11, 2023 16:25 IST

खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे.

वाशिम :  आगामी खरीप हंगामात  जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्या-त्या बँकांना उद्दिष्ठ ठरवून देण्यात आले असून त्यानुसार कर्जवाटप करण्याच्या सूचना सहकार विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे. खरीप हंगामातील पेरणीला अजूनही तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पेरणीवेळी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण जाणवते, उसणवारी, व्याजाने पैसे घेऊन त्यांना पेरणीचे काम पूर्ण करावे लागते. शेतकऱ्यांना पेरणीवेळी पैशाची निकड भासू नये, यासाठी त्यांना पेरणीपूर्वीच कर्ज मिळावे, यासाठी १ एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरुवात केली जाते. बँकांकडे शेतकऱ्यांनी कर्जप्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना वेळेत कर्ज देणे क्रमप्राप्त असते. मात्र अनेक बँकां कर्जप्रस्ताव निकाली काढण्यास विलंब करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कर्ज मिळणे कठीण बनते. शिवाय कर्जाचे नुतनीकरण करण्यावरच बँकांचा भर असतो. त्यामुळे नवीन कर्जदार संख्या वाढत नसल्याचे आढळून येते. यंदा बँकांनी पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्यवर्ती बँकेला सर्वाधिक उद्दिष्टजिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या अधिक शाखा असल्याने या बँकेला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आल्याचे चित्र आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला ७७० कोटी १८ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून ज्याचा लाभ ६६ हजार ४३९ शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकाना ३७ हजार २८१ शेतकऱ्यांना ४२६ कोटी २२ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. खासगी क्षेत्रातील बँकांना ४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ५० कोटी ४७ लाख तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला १३६३६ शेतकऱ्यांना १५७ कोटी ९७ लाख रुपये कर्जवाटप लक्षांक देण्यात आला आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्याला यंदा १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट मिळाले आहे. जिल्ह्यातील त्या-त्या बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, या हेतूने बँकांनी कर्ज वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील कर्जासाठी वेळीच प्रस्ताव बँकांकडे द्यावा

- दिग्विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

टॅग्स :Farmerशेतकरी