शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१४९५ जागांसाठी ४८९९ उमेदवारी अर्ज

By admin | Updated: July 21, 2015 00:53 IST

वाशिम जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी ; १६३ ग्रामपंचायतींची होणार निवडणूक.

वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या १४९५ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ४८९९ हजार उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायतींमध्ये २३१ सदस्य, मालेगाव तालुक्यात ३0 ग्रामपंचायतींमध्ये २७६ सदस्य , मंगरुळपीर तालुक्यात २५ ग्रामपंचायतींमध्ये २0९, रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये ३३४ सदस्य, कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींमध्ये २११ सदस्य, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींमध्ये २३४ सदस्य अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये १४९५ सदस्य निवडूून द्यावयाचे आहे. ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाच्या व अटीतटीच्या होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी, २0 जुलैला जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाशिम तालुक्यातून ३९७, रिसोड ६५0, मालेगाव ६१६, मंगरुळपीर २८३, कारंजा ५५४ व मानोरा तालुक्यातून ३१५ असे एकूण ४८९९ अर्ज प्राप्त झालेत. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतसाठी होत असलेल्या निवडणुकीकरिता तालुकानिहाय शेवटच्या दिवसापर्यंत एकूण प्राप्त अर्जामध्ये वाशिम तालुक्यातून ७५३, रिसोड १0८६, मालेगाव ९६८, मंगरुळपीर ७८२, कारंजा ६७९ व मानोरा तालुक्यातून ६३१ असे एकूण 000 अर्ज प्राप्त झालेत. २१ जुलै रोजी अर्जाची छाननी होणार आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीसाठी इच्छूक उमेदवारांचे १९८0 नामांकन अर्ज दाखल झाले होते. १८ जुलैचा रमजान दिन आणि १९ जुलैचा रविवार यामुळे या दोन्ही दिवशी इच्छुकांना अर्ज दाखल करता आले नाहीत त्यामळे शेवटच्या दिवशी २0 जुलैला जिल्हयातील तहसील कार्यालयावर मोठय़ा प्रमाणात अर्ज भरणार्‍यांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणुकांसाठी ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान शहरासह ग्रामीण भागात ह्यइंटरनेट कनेक्टिव्हिटीह्ण नसल्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक दिसून आली. ऑनलाइनचा गोंधळ पाहता, राज्य निवडणूक आयोगाने अर्ज स्वीकारण्याला दीड तासांची मुदतवाढ दिली तसेच पारंपरिक पद्धतीने अर्ज स्वीकारण्याबात सूचित केले. तसेच मालेगाव तालुक्यातील वसारी, तिवळी यांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत अविरोध होण्याची शक्यता असली तरी अद्याप याबाबत घोषणा करण्यात आली नाही.