शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेतील १३ प्रकरणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. ...

शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. घराचे अर्थकारण शेतकऱ्यावरच अवलंबून असल्याने समस्या अधिक गंभीर बनते. या संकटातून सावरण्यासाठी आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सर्पदंश, रस्ता अपघात, पाण्यात बुडून, विजेचा धक्का लागून, तसेच वीज अंगावर पडून जिल्ह्यातील ४८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी ३५ जणांच्या कुटुंबांनाच मदत मिळू शकली आहे.

----------

२०२० साली दाखल आणि मंजूर प्रस्ताव

रस्ता अपघात, वाहन अपघात- दाखल ३५, मंजूर २१

विजेचा धक्का - दाखल ६, मंजूर ६

सर्पदंश दाखल -०३, मंजूर ३

बुडून किंवा उंचावरून पडून -दाखल ४, मंजूर ३

-----

सर्वाधिक प्रकरणे अपघाताची

जिल्ह्यात २०२० या वर्षांत विविध अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४८ शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी शेतकरी अपघात विमा योजनेत मदतीसाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल केले.

कृषी विभागाकडे दाखल प्रस्तावात रस्ता, वाहन अपघात, वीज पडून, विजेचा धक्का लागून, सर्पदंशाने, पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे. तथापि, सर्वाधिक ३४ प्रकरणे रस्ता अपघातात झालेल्या मृत्यूंची आहेत.

-------

कोट : जिल्ह्यात गतवर्षी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विविध प्रकारचे ४८ प्रस्ताव मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांकडून मदतीसाठी सादर करण्यात आले होते. शासन निकषानुसार या प्रस्तावांची पडताळणी करून पात्र प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, अपात्र पकरणे रद्द करण्यात आली आहेत.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम