शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेतील १३ प्रकरणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:17 IST

शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. ...

शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. घराचे अर्थकारण शेतकऱ्यावरच अवलंबून असल्याने समस्या अधिक गंभीर बनते. या संकटातून सावरण्यासाठी आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सर्पदंश, रस्ता अपघात, पाण्यात बुडून, विजेचा धक्का लागून, तसेच वीज अंगावर पडून जिल्ह्यातील ४८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी ३५ जणांच्या कुटुंबांनाच मदत मिळू शकली आहे.

----------

२०२० साली दाखल आणि मंजूर प्रस्ताव

रस्ता अपघात, वाहन अपघात- दाखल ३५, मंजूर २१

विजेचा धक्का - दाखल ६, मंजूर ६

सर्पदंश दाखल -०३, मंजूर ३

बुडून किंवा उंचावरून पडून -दाखल ४, मंजूर ३

-----

सर्वाधिक प्रकरणे अपघाताची

जिल्ह्यात २०२० या वर्षांत विविध अपघातात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी ४८ शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी शेतकरी अपघात विमा योजनेत मदतीसाठी कृषी विभागाकडे प्रस्ताव दाखल केले.

कृषी विभागाकडे दाखल प्रस्तावात रस्ता, वाहन अपघात, वीज पडून, विजेचा धक्का लागून, सर्पदंशाने, पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे. तथापि, सर्वाधिक ३४ प्रकरणे रस्ता अपघातात झालेल्या मृत्यूंची आहेत.

-------

कोट : जिल्ह्यात गतवर्षी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत विविध प्रकारचे ४८ प्रस्ताव मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांकडून मदतीसाठी सादर करण्यात आले होते. शासन निकषानुसार या प्रस्तावांची पडताळणी करून पात्र प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, अपात्र पकरणे रद्द करण्यात आली आहेत.

-शंकर तोटावार,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम